मुंबई : मुंबईमध्ये दोन तीन दिवसांपासून बरसणाऱ्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तलावांपैकी एक तलाव म्हणजे तुलशी तलाव तुडुंब भरून वाहू लागला आहे. कारण गेल्यावर्षी हाच तलाव पूर्ण भरण्यासाठी ऑगस्ट महिन्याची वाट पाहावी लागली होती.
मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या माहिती नुसार तुळशी तलाव आज सकाळी साडेसात वाजल्यापासून ओसंडून वाहू लागला आहे आणि पूर्णपणे भरला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा तलाव एक महिना लवकर भरल्याचे प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आहे.
एकूणच गेल्या दोन तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली असली तरी ही एक बातमी मुंबईकरांना सुखावणारी ठरली आहे.
