नाशिक , १३ जून | शिवसेना खासदार संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी राऊत म्हणाले की, आधीच्या आघाड्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाची वाटणी व्हायची. पण आता पाच वर्षे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपद राहणार आहे. यामध्ये कोणतीही वाटाघाटी होणार नाही. शरद पवारांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या भाषणात हेच म्हटले आहे. आमच्या कुणाच्या मनात अशी शंका नाही. फक्त प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून वक्तव्य केले. महाविकास आघाडीमध्ये कोणतीही नाराजी नाही काँग्रेसमध्ये नाराजी नाही,असे राऊत म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत मोदी निर्णय घेतील:
राऊत म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना मराठा आरक्षणाबद्दल हात जोडून विनंती केली आहे. त्यावर आता ते पुढील निर्णय घेतील. विरोधकांनी महाराष्ट्रातल्या वातावरणात गढूळपणा आणू नये. एक मराठा लाख मराठा दिल्लीत दिसायला हवा. ‘मराठा आरक्षण मार्गी लावण्यात काढण्यात येणारा मोर्चा दिल्लीत काढायला हवा. आरक्षणाबद्दल आम्ही हात जोडून विनंती केली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील,’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

वाघाच्या मिशीला हात घालण्याची हिम्मत कुणाचीच नाही:
राऊत पुढे म्हणाले की, आपण महाराष्ट्रातील राजकारणी आहोत. शत्रुत्व टोकाचं नसत, राजकारणात मतभेद असतात. चंद्रकांत पाटील यांना मी चांगल्या भावनेने शुभेच्छा दिल्या. त्यांना सांगू इच्छतो की, वाघाच्या मिशीला हात घालण्याची हिम्मत कुणाचीच नाही, असा टोला त्यांनी लगावला.

 

News Title: Shivsena MP Sanjay Raut talked on Maratha reservation during north Maharashtra tour news updates.

मोदींना मराठा आरक्षणाबद्दल हात जोडून विनंती केली आहे, ते पुढील निर्णय घेतील –  संजय राऊत