अँटीगा, १३ जून | पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चौकसी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मेहुल चौकसी याला अँटिगामधून डोमिनिकामध्ये आणण्यात आले असून तेथून त्याला भारतात आणण्याची तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे मेहुल चौकसी यांने डोमिनिका उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने ती याचिका नाकारत पळून जाण्याचा धोका असल्याचे सांगितले होते.

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. दरम्यान, अँटिगा अपहरण प्रकरणामागे भारतीय एजन्सींचा हात असल्याचा आरोप सुप्रीम कोर्टातील मेहुल चौकसीचे वकील विजय अग्रवाल यांनी केला आहे. कारण अँटिगामध्ये ते केस पराभूत होत असल्याने मेहुलचे अपहरण केल्याचे अग्रवाल म्हणाले.

मेहुल चौकसी भारतात का येत नाहीये? काय त्याला आपल्या देशातील लोकशाहीवर भरोसा नाही? भारतीय प्रसार माध्यमांनी मेहुलचे वकील विजय अग्रवाल यांच्याशी संभाषण करत काही प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी वकील विजय अग्रवाल यासंदर्भात वक्तव्य केलं.

 

News Title: Indian agencies hand in Mehul Choksi kidnapping from Antigua political forces threaten his life when he comes to India news updates.

अँटिगा अपहरणामागे भारतीय एजन्सींचा हात, भारतात राजकीय शक्तींपासून जीवाला धोका – मेहुल चौकसीच्या वकिलाचा दावा