21 March 2023 1:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण? Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...? Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा SBI Bank Account Alert | एबीआय बँक ग्राहकांना महत्वाचा अलर्ट, तुमच्या खात्यातूनही पैसे कापले गेले असतील पहा, किती रक्कम? IRCTC Railway Confirm Ticket | कन्फर्म तिकीटाशिवाय ट्रेनमध्ये प्रवास कसा करावा? अडचणीच्या वेळी हा नियम लक्षात ठेवा
x

पालकांसाठी बुरे दिन! यावर्षी स्कूल बसचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढणार

Shivsena, BJP

मुंबई : स्कूल बस मालक संघटनेने वाढलेल्या महागाईचे कारण पुढे करत स्कूल बसच्या दरात आगामी शैक्षणिक वर्षापासून दहा ते पंधरा टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी मालक संघटनेने जाहीर केलेल्या धोरणातून ही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले की, डिझेलसह बसचा विमा, कर्मचाऱ्यांचे वेतन, बसचा देखभाल खर्च वाढला आहे असं स्पष्ट केलं. याशिवाय मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे बस मालकांच्या खर्चात वाढ झाली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने सुरक्षेच्या नावाखाली आणलेल्या नव्या नियमावलीमुळेही बस मालकांचे बजेट कोलमडले आहे. परिणामी, २०१९-२० या येत्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल बससाठी दहा ते पंधरा टक्के दरवाढ केली जाईल.

दरम्यान, मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे स्कूल बस मालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यंदा पावसाळ्यात ज्या मार्गावर खड्डे असतील, त्याठिकाणी स्कूल बस सेवा बंद केली जाईल, असे अनिल गर्ग यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. खड्ड्यांबाबत वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही मार्ग निघत नसल्याने यापुढे पालकांनीच महापालिकेसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.

मुंबईत तेरा आसनी क्षमतेहून कमी आसन क्षमतेच्या वाहनांना स्कूल बसचा परवाना देऊ नये, असे कोर्टाचे आदेश आहेत. तरीही आरटीओकडून परवाना देण्यात येत असून वाहतूक पोलीसही अशा बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे तेरा आसन क्षमतेहून कमी आसन क्षमतेच्या वाहनांमधून शाळकरी मुलांची वाहतूक दिसल्यास संबंधिच विभागातील वाहतूक पोलीस आणि आरटीओंविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करणार असल्याचे संघटनेने सांगितले.

हॅशटॅग्स

#Vinod Tawde(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x