सुप्रीम कोर्टाच्या टिपण्यांनी धाकधूक वाढवली | फडणवीस दिल्लीला रवाना, तर शिंदेंना थकवा जाणवू लागल्याने आरामाचा सल्ला

CM Eknath Shinde | आजच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीशांनी केलेल्या विविध टिपण्या शिंदे गटात हादरा देऊन गेल्याच वृत्त आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने बाजू मांडणारे हरीश साळवे यांनी ‘जरी विधानसभा सदस्यत्व गेलं तरी’ असा वाक्य प्रयोग बाजू मांडताना केल्याने भलतीच शंका व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यात अचानक इतर वृत्त समोर आली आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवू लागला :
सतत दौऱ्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थकले आहे. त्यामुळे शिंदेंनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. राज्यात सत्ता आल्यापासून सातत्याने दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवू लागला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्याने शिंदे यांनी सर्व त्यांचे सर्व प्रशासकीय आणि राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत.
दुसरीकडे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले परंतु, अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी काल सांगितले होते की येत्या रविवार पर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. आणि फडणवीस तातडीने दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती आहे. आजच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर देवेंद्र फडणवीस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. फडणवीस तातडीने दिल्लीला का गेले याचे उलट सुलट अर्थ लावले जात आहेत.
मंत्रिमंडळाचा विस्तार अजून लांबणीवर :
दरम्यान, उद्या 5 ऑगस्ट रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सर्व कार्यक्रमही रद्द केले आहेत. मात्र हे सर्व विषय अचानक सर्वोच्च न्यायालयाच्या विविध टिपण्यानंतर पुढे आल्याने वेगळीच शंका राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येतं आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: DCM Devendra Fadnavis moved for New Delhi after Supreme Court hearing check details 04 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Stocks in Focus | धमाकेदार रिटर्न्स, 5 दिवसात 67 टक्के परतावा, गुंतवणूकदारांना मजबूत फायदा, हे स्टॉक्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
-
Credit card | तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर या 10 गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे, अन्यथा खूप नुकसान होईल
-
Bihar Political Crisis | बिहारमध्ये 2 दिवसांत खेला होबे?, भाजप प्रणित एनडीएमध्ये फूट पडणार, राजद भाजपशी आघाडी तोडणार?
-
Outstanding Tax Demand | रिटर्न प्रोसेसिंगनंतर येतेय 'आऊटस्टँडिंग टॅक्स डिमांड?, घाबरून जाण्याऐवजी या स्टेप्स फॉलो करा
-
Investment Scheme | रोज फक्त 200 रुपये बचत करा, तुम्हाला 2 कोटी 11 लाख रुपयांचा परतावा मिळेल
-
Bihar Politics | नितीश-तेजस्वी एकत्र येणार, युती तोडण्याची घोषणा होऊ शकते, मोदींचा २०२४ मधील मार्ग खडतर
-
संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार अजुन काही दिवस केवळ शिंदे-फडणवीसांचं 'अति सूक्ष्म कॅबिनेट मंत्रिमंडळच' सांभाळणार?, कारण काय?
-
Investment Tips | तुमच्या गुंतवणुकीत उत्तम असेट्स मॅनेजरची निवड कशी करावी?, फायद्याची माहिती जाणून घ्या
-
WhatsApp Updates | व्हॉट्सॲपमध्ये होणार मोठे बदल, या मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स काढू शकणार नाही
-
Modi Govt Failure | खाजगी आरोग्य विमा कंपन्या नफ्यात, तर सरकारी आरोग्य विमा कंपन्यांना 5 वर्षांत 26,364 कोटीचा तोटा