पाटणा, २५ जून : बिहारमध्ये गुरुवारी आलेल्या वादळाने राज्यात थैमान घातलं असून यात मोठी जीवितहानी झाली आहे. राज्यात विविध भागात वीज कोसळून तब्बल ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सर्वाधिक १३ बळी हे गोपालगंज जिल्ह्यात गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या जीवितहानीमुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वादळात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
#UPDATE 83 people have died due to thunderstorms in Bihar today; maximum 13 people lost their lives in Gopalganj district: State Disaster Management Department https://t.co/cHOmutIr0l
— ANI (@ANI) June 25, 2020
बिहारमध्ये गुरूवारी वादळामुळे प्रचंड जीवितहानी झाली आहे. वादळादरम्यान राज्यात ठिकठिकाणी विजा कोसळून तब्बल ८३ नागरिक मरण पावले आहेत. यात सर्वाधिक वीजबळी गोपालगंज जिल्ह्यात गेले आहेत. गोपालगंजमध्ये वीज कोसळून १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मधुबनी व नबादा जिल्ह्यात प्रत्येकी ८ लोक मरण पावले आहेत.
Bihar Chief Minister Nitish Kumar announces Rs 4 lakhs each for 83 people who lost their lives due to thunderstorms in the state. https://t.co/EtiX2gLgt7 pic.twitter.com/03hVtPtZYn
— ANI (@ANI) June 25, 2020
बिहारमधील आठ जिल्ह्यामध्ये ५ वीजबळी गेले आहेत. यात गोपालगंज, पूर्वी, चंपारण, सिवान, बांका, दरभंगा, भागलपूर, मधुबनी व नबादा यांचा समावेश आहे. मृतांच्या आकडा समोर आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे. वीज कोसळून मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा नितीशकुमार यांनी केली आहे.
News English Summary: The storm that hit Bihar on Thursday has taken a heavy toll on the state. As many as 83 people have been killed in lightning strikes in various parts of the state. The highest number of 13 victims have gone to Gopalganj district.
News English Title: 83 people have been killed in lightning strikes in various parts of the Bihar state News latest Updates.
