नवी दिल्ली, ०५ फेब्रुवारी: केंद्रानं लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आता शेतकरी आंदोलन आता तापलंय. सद्यस्थितीत सरकारशी चर्चा करणं शक्य नाही, असं शेतकरी संघटनांनी स्पष्ट केलंय. जेव्हापर्यंत निर्दोष शेतकऱ्यांवर आणि शेतकरी नेत्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले जात नाही, या भागातील इंटरनेट सेवा पुन्हा सुरळीत होत नाही तेव्हापर्यंत चर्चेची शक्यताच शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावलीय.
दिल्ली सरकारकडून आम्हाला ११५ लोकांची एक यादी मिळाली आहे. मात्र, अद्याप देखील आमचे एकूण सहा लोक बेपत्ता आहेत, असंही शेतकऱ्यांनी स्पष्ट केलंय. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला आणि दिल्लीच्या इतर परिसरात उसळलेल्या हिंसाचारानंतर अनेक शेतकरी बेपत्ता आहेत.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे वास्तव आणि भव्य स्वरूप सामान्य लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन सुरु असलेल्या भागातील इंटरनेट सेवा ठप्प करण्याचे प्रकार सुरूच ठेवले आहेत. याच विषयाला अनुसरून आपचे खासदार भगवंत मान यांनी मोदी सरकारला लक्ष केलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “लोकांनी पैसे मोजून खरेदी केलेला खाजगी डेटा त्यांच्या परवानगीशिवाय बॅन केला जातो…मग विचार करा जर याच कंपन्यांच्या नियंत्रणाखाली “आटा” आला तर काय होईल…
लोगों द्वारा private कंपनी से ख़रीदा हुआ internet डाटा जब मर्ज़ी बैन हो जाता है..
तो सोचो अगर इन कंपनीयो के कंट्रोल में ‘आटा’ आ गया तो क्या होगा…— Bhagwant Mann (@BhagwantMann) February 5, 2021
News English Summary: The farmers’ agitation is now heating up against the three agricultural laws implemented by the Center. At present, it is not possible to discuss with the government, the farmers’ organizations have clarified. Until the charges against innocent farmers and farmer leaders are withdrawn, the possibility of a discussion is ruled out by the farmers’ leaders until the internet service in the area is restored.
News English Title: AAP party MP Bhagwant Mann slams Modi govt over disconnecting internet during farmers protest news updates.
