नवी दिल्ली : तान्ह्या बाळाची माउली आंदोलनकर्त्यांना अडवलेली रुग्णवाहिका सोडण्यासाठी विनवण्या करत होती, परंतु आंदोलनकर्त्यांनी सरकारविरुद्धच्या रागात ‘भारत बंद’ करता-करता, तान्ह्या बाळाचे उपचाराअभावी ‘श्वासच बंद’ केले आणि सर्वांचा माणुसकीवरचा विश्वासच उडाला.

दलित अत्याचारविरोधी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात देशभरातील दलित संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. देशभर पुकारलेल्या भारत बंदला हिंसक वळण लागून अनेक जणांनी आपले प्राण ही गमावले आहेत. उत्तरेकडील राज्यात आणि विशेष करून युपी – बिहारमध्ये याची अधिक झळ पाहायला मिळत आहे.

एका नवजात बालकाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच आंदोलकांनी ती रग्णवाहिका अडवून धरली. जन्म झाल्यानंतर लगेचच त्या तान्ह्या बाळाची प्रकृती खालावल्याने त्याचे पालक त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून हाजीपूर येथील रुग्णालयात घेऊन जात होते. आंदोलकांनी रस्त्यावर टायर्स आणि इतर वस्तू टाकून रस्त्यावर अडथळे निर्माण केले होते. तान्ह्या बाळाची माउली आंदोलनकर्त्यांना अडवलेली रुग्णवाहिका सोडण्यासाठी विनवण्या करत होती, परंतु, आंदोलकांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले नाही. या आंदोलकर्त्यांनी रुग्णवाहिकेचा रस्ता तसाच रोखून धरला. अखेर उपचाराअभावी त्या तान्ह्या निर्दोष बाळाने त्या माऊलीच्या कुशीतच आपले प्राण गमावले.

मात्र या प्रकाराने सर्वच थरातून आंदोलकांबद्दल चीड व्यक्त करण्यात येत आहे.

Bharat band violence child dies due mob stop ambulance