26 April 2024 12:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

उद्धव ठाकरेंविरोधात लिहिणाऱ्यांवर राज्यात अत्याचार | भाजपचं शिष्टमंडळ राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे

BJP MP Vinay Sahasrabuddhe, CM Uddhav Thackeray, National Human rights Commission, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १७ सप्टेंबर : भाजपा शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वात राज्यसभा सदस्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. एचएल दत्तू यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत भाजपा खासदारांनी राज्यातील ८ घटनांचा हवाला देत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत.

राज्यसभेचे सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वात राज्यसभेचे खासदार भागवत कराड आणि डॉ. विकास महात्मे यांनी आयोगाला सांगितले की, डिसेंबर २०१९ पासून राज्यात मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात लिहिणाऱ्यांवर अत्याचार केले जात आहेत.

२३ डिसेंबर २०१९ रोजी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात हिरामन तिवारी नावाच्या व्यक्तीने भाष्य केले, तर सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीवर हल्ला करुन जबरदस्तीने त्याचे मुंडन करण्यात आले. २६ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाकडून फी वाढवल्यामुळे त्याचा विरोध करणाऱ्यांना मारहाण, पालघरमध्ये १६ एप्रिल रोजी झालेल्या दोन साधू प्रकरण, पत्रकारांना ताब्यात घेणे अशा घटनांचा उल्लेखही भाजपा खासदारांनी उपस्थित केला आहे.

दुसरीकडे, अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत सरकारवर निशाणा साधला. “सरकारनं बाजारात विक्रीसाठी खुप काही उपलब्ध केलंय,” असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली.

“देशाची आर्थिक स्थिती खूप गंभीर आहे. अशा स्थितीत देशाचा जीडीपी आणि रिझर्व्ह बँक कंगाल झाली आहे. त्यातच एअर इंडिया, रेल्वे, एलआयसी आणि बरंच काही सरकारनं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केलं आहे. बाजारात विक्रीसाठी मोठा सेल लागला आहे. आता या सेलमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टदेखील आणलं आहे,” अशी टीका राऊत यांनी केली.

सरकार जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट खासगी कंपनीकडे देण्याचा विचार करत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जगातील सर्वात मोठं बंदर आहे. त्यातून भारत सरकारला ३० टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळतो. असं महत्त्वपूर्ण बंदर खासगी कंपनीच्या हाती देणं राष्ट्री सपत्तीचं मोठं नुकासान असल्याचंही राऊत म्हणाले.

 

News English Summary: Seeking to corner the Uddhav Thackeray-led coalition government in Maharashtra over recent incidents including the roughing up of a retired Navy officer, a group of BJP MPs led by party vice president Vinay Sahasrabuddhe has approached the National Human Rights Commission (NHRC) demanding a probe into the happenings. In a letter to NHRC chairperson H L Dattu, the BJP MPs have claimed that there have been several violations of rights in Maharashtra since December 2019.

News English Title: BJP MP Vinay Sahasrabuddhe Complaint against the CM Uddhav Thackeray state government to National Human rights Commission Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x