मुंबईः नागरिकत्व दुरुस्ती कायदा संपूर्ण देशभरात लागू झाला असून, चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. अनुराग कश्यप यांनी सुरुवातीपासून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ११ डिसेंबर रोजी संसदेत मंजूर करण्यात आले होते.

“आजपासून सीएए कायदा लागू झाला. मोदींना म्हणावं पहिले तुमचे कागदपत्र, entire political science ची पदवी दाखवा. तसेच वडिलांचे आणि खानदानाचे जन्म प्रमाणपत्र सगळ्या हिंदुस्थानाला दाखवा, नंतर आमच्याकडे मागणी करा”, अशी टीका अनुराग कश्यपने ट्विटरद्वारे केली आहे. एवढ्यावरच न थांबता अन्य एका ट्विटमध्ये, ‘मोदींनी शिक्षण घेतलंय हे सिद्ध करा’ असं आव्हानही त्यांनी दिलं आहे.

यापूर्वी देखील अनुराग कश्यप यांनी मोदींना लक्ष केलं आहे. त्यावेळी अनुराग कश्यपने नरेंद्र मोदींवर जहरी टीका करत ट्विट केलं होतं की, आमचे मुख्य सेवक, आमचे पंतप्रधान, जनतेचे मुख्य नोकर बहिरे व मुके आहेत आणि भावनांच्या पलिकडील आहेत. ते फक्त नौटंकी आहेत जे भाषण देऊ शकतात. बाकी सगळं त्यांच्या अवाक्याबाहेर आहे. त्यांना ना दिसत आहे नाही ऐकू येत आहे. आता ते नवीन नवीन खोटं शिकण्यात व्यग्र आहेत.

 

Web Title:  Bollywood Director Anurag Kashyap Demands Prime Minister Narendra Modi Fathers Birth Certificate.

CAA कायदा: मोदीजी तुमच्या वडिलांचे आणि खानदानाचे जन्म दाखले हिंदुस्थानाला दाखवा