नवी दिल्ली, १९ जून : गलवान खोऱ्यात चीनकडून हिंसक झडप घालण्यात आली. यात भारताचे २० जवान शहीद झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी तीन मुद्दे उपस्थित केले आहेत. राहुल यांनी लिहिले, “आता हे सिद्ध झाले आहे, की चीनने गलवानमध्ये जो हल्ला केला तो आधीपासूनच नोयोजित होता. भारत सरकार यावेळी झोप घेत होते आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत होते. या शिवाय राहुल गांधींनी लिहिले आहे, सरकारच्या हलगर्जीपणाचा परिणाम आपल्या जवानांना भोगावा लागला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या ट्विटसोबतच एएनआयचे एक वृत्तही ट्विट केले आहे. यात, संरक्षण राज्य मंत्री श्रीपद नाईक यांचे वक्तव्य आहे. चीनने केलेला हा हल्ला आधीपासूनच नोयोजित होता, असे श्रीपद नाइक यांनी मान्य केले आहे. तसेच भारतीय लष्कर चीनला चोख उत्तर देईल असे म्हटले होते.

दुसरीकडे शिवसेनेने देखील यावरून केंद्र सरकार आणि मोदींवर निशाणा साधला आहे. आमच्या जवानांचे बलिदा वाया जाऊ देणार नाही, असे आता सांगण्यात आले. मोदी म्हणतात, डिवचल्यास उत्तर देऊ. २० जवानांना हाल हाल करुन मारले हे डिवचणे नाही तर काय, असा सवाल शिवसेनेने उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

 

News English Summary: The Indian government was sleeping at this time and ignoring the problems. Apart from this, Rahul Gandhi has written that the government’s negligence has taken its toll on our soldiers.

News English Title: Congress leader Rahul Gandhi attacks Modi government on Galwan valley india china clash News latest Updates.

केंद्राच्या हलगर्जीपणाचा परिणाम आपल्या जवानांना भोगावा लागला आहे – राहुल गांधी