26 April 2024 9:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा
x

त्या स्वातंत्रवीराची अनास्थाच? वीर सावरकर केवळ स्वतःच्या फोटोशूटसाठी?

मुंबई : काल प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नामवंत संगीतकार भूपेन हजारिका यांची या वर्षीच्या ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. त्यापैकी नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर जाहीर झाला आहे. परंतु, असं असलं काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंदमान-निकोबारला भेट देऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्यापाण्याची सजा देताना ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते, त्या प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन मोठ्या प्रमाणावर फोटोशूट केले होते.

दरम्यान मोदींच्या त्याच अंदमान निकोबार दौऱ्यातील फोटोशूटचा भाजपने समाज माध्यमांवरून मोठा प्रचार केला होता. त्यानंतर वीर सावरकरांच्या योगदानाला काँग्रेसने नव्हे तर मोदींनी न्याय दिला असा प्रचार सुरु केला होता. परंतु, एखाद्याच्या कर्तृत्वाचा गौरव त्या संबंधित ठिकाणाला केवळ भेट देऊन होत नसतो याचे भान विद्यमान सरकारला राहिलेले नाही.

स्वातंत्रवीर असे ज्यांची ओळख आहे त्याचा भारतरत्न देण्यासाठी विचारसुद्धा झाला नाही ही खेदाची गोष्ट आहे. परंतु, अंदमान निकोबार दौऱ्यातील विविध अँगलमधून फोटोशूट करून त्याचा प्रचार करणे आणि त्यांच्या योगदानाला न्याय दिल्याच्या बाता मारणे ही सर्वाधिक खेदाची बाब आहे. कदाचित लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका नाहीत हे त्या मागील मुख्य कारण असावं, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

आज भारतरत्न पुरस्कार न दिल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. विनायका प्राण तळमळला असे लिहून भारतरत्न पुरस्काराचे चिन्ह संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x