नवी दिल्ली, ११ जुलै : महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत अद्यापही संभ्रमता कायम असताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर केली आहे. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणं गरजेचं आहे, असं केंद्रीय गृह मंत्रलयाचं म्हणणं आहे. त्यामुळे यासंदर्भात यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, या निर्णयाला राहुल गांधी यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. याविषयाला अनुसरून राहुल गांची यांनी म्हटलं आहे की, “कोरोना आपत्तीत परीक्षा घेणं चुकीचं आहे. मागील वर्षाच्या कामगिरीवर विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. दरम्यान मनुष्यबळ विकास आणि UGC च्या या निर्णयावर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील टीका केली आहे.

दुसरीकडे कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील सर्व विद्यापीठांच्या आणि अंतिम वर्षांच्या परीक्षा यंदा रद्द करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने ठरवलेल्या मापदंडानुसार पदवी परीक्षेचे गुण दिले जातील, अशी घोषणा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज येथे केली. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या राज्यातील इतर विद्यापीठांच्याही परीक्षा रद्द कराव्यात, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

News English Summary: In a fresh plea, Delhi chief minister Arvind Kejriwal on Saturday sought Prime Minister Narendra Modi’s intervention to cancel upcoming final year exam of Delhi University and other central government universities.

News English Title: Exams cancelled in all Universities in Delhi deputy CM Manish Sisodiya declared News Latest updates.

केजरीवाल सरकारकडून सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा