15 February 2025 3:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Money Alert | प्रायव्हेट नोकरदारांसाठी मोठी बातमी, रु.18000 सॅलरी असणाऱ्यांच्या खात्यात 1,30,35,058 रुपये जमा होणार Loan EMI Alert | कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना 'या' महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल Horoscope Today | शनिवार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य, मेष आणि तुळ सह या राशींसाठी शनिवारचा दिवस शुभ राहील Shukra Rashi Parivartan | शुक्र अस्त आणि उदय होणार, या 3 नशीबवान राशींच्या नशिबाचा उदय होणार, तुमची राशी कोणती New Income Tax Bill | सावधान, नवीन इन्कम टॅक्स बिलचा थेट तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डवर परिणाम होणार, अपडेट लक्षात ठेवा UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या
x

गलवान खोऱ्यातील नदीच्या पुरातून सहकाऱ्यांना वाचविताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

Indian Army, Jawan Sachin Vikram More, shahid, Galwan Valley

मालेगाव, २५ जून : पूर्व लडाखच्या सीमेवरुन भारत-चीनमध्ये संघर्ष वाढल्याने तणावात भर पडली. गलवान खोऱ्यात चीन सैन्यांकडून हिंसक झडप घालण्यात आली होती. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. दरम्यान, गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरु असताना दोन जवानांना पुरातून वाचविताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे.

भारत-चीन सीमेवर तणाव सुरु असलेल्या गलवान घाटीमध्ये कर्तव्य बजावत असतांना मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील सचिन विक्रम मोरे या जवानाला वीरमरण आले. या वृत्तानंतर साकुरी गावात शोककळा पसरली आहे. गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरु असताना अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात भारतीय लष्करातील दोन जवान पाण्यात पडले. ते वाहून जात असताना त्यांना वाचविण्याच्या प्रयत्न जवान सचिन मोरे यांनी प्रयत्न केला. मात्र, जवान सचिन मोरे यांनाही वीरमरण आल्याची घटना काल घडली.

दरम्यान, पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी, सैन्य मागे घेण्यासाठी भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चा सुरु आहे. पण त्याचवेळी चीनने गलवान खोऱ्यातील संघर्ष झालेल्या ठिकाणी पुन्हा बांधकाम केले आहे. सॅटलाइट फोटोवरुन चीनने संघर्ष झालेल्या भागात पुन्हा बांधकाम केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मागच्या आठवडयात १५ जूनच्या रात्री पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ चीनने टेहळणी चौकी उभारल्याने मोठा संघर्ष झाला होता. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनने ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते. चीन आता चर्चेच्या माध्यमातून वाद सोडवण्यात आपल्याला रस आहे असे दाखवतोय, पण प्रत्यक्षात नियंत्रण रेषेवरील त्यांचा आक्रमक पवित्रा अजूनही कायम आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.

 

News English Summary: Sachin Vikram More, a soldier from Sakuri in Malegaon taluka, died while on duty in the tense Galwan Valley on the Indo-China border. Mourning has spread in Sakuri village after this news.

News English Title: Indian Army Jawan Soldeir Sachin Vikram More shasid at Galwan Valley on the Indo China border News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x