1 May 2025 6:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

संघ मोदी 'भक्तांवर' नाराज, संघातील नागपूर लॉबी 'दक्ष' झाली ?

नागपूर : नरेंद्र मोदी खूप झपाट्याने देशात मोठे होत आहेत त्यामुळेच कि काय नागपूर लॉबी जरा दक्ष झाल्याचे समजते. सध्या नागपुरातील लॉबी दक्ष झाल्यामुळे आरएसएस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात द्वंद्व पेटल्याचे पाहावयाला मिळत आहे. मोदींचा देशभरात आवाका दिवसेंदिवस वाढतच चालल्यामुळे शेवटी संघातील नागपूर लॉबी मोदी ‘भक्तांच्या’ बाबतीत जास्तच ‘दक्ष’ झाल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर लॉबीने त्याआधी २०१५ मध्ये आणि याच महिन्यात म्हणजे २०१८ मध्ये मोदींच्या प्रयत्नांना सुरुंग लावल्याची चर्चा आहे. लवकरच म्हणजे २०१९ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी आणि अमित शहा यांना नियंत्रणात कसे ठेवायचे कसे हा प्रश्न पडला आहे. संघाच्या गोटात यावर खूप गंभीरपणे चर्चा सुरु असल्याचे समजते आणि चर्चेला कारण ठरले आहे, ईशान्येतील निवडणुका जिथे मेहेनत घेतली संघाने परंतु भाजपने सर्व श्रेय घेतल्याने संघातील वरिष्ठ खूप दुखावले गेल्याचे समजते.

परंतु २०१९ पूर्वीच मोदींना नियंत्रणात ठेवण्यासाठी संघ सज्ज झाला आहे त्यामुळेच मोदींनी खूप मोठे प्रयत्न करून सुद्धा संघातील महत्वाच्या पदावर म्हणजे सरकार्यवाह पदावर मोदींच्या दबावानंतर सुद्धा दत्तात्रय होसबळे यांना या पदापासून संघाने दूरच ठेवणे पसंत केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सरकार्यवाह या महत्वाच्या पदावर जे सरसंघचालक पदानंतरचे म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे अधिकार असलेले पद म्हणून ओळखले जाते. त्याठिकाणी भैयाजी जोशी म्हणजे सुरेश जोशी यांची निवड करण्यात आली. नरेंद्र मोदी हे दत्तात्रय होसबळे यांची सरकार्यवाहपदावर वर्णी लावण्यास खूप प्रयत्नशील होते, परंतु संघाच्या नागपूर लॉबीने मोदींचा पंतप्रधान झाल्यापासून दोन वेळा केलेला हा प्रयत्न अपयशी केला आहे.

दत्तात्रय होसबळे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मार्गे संघात दाखल झाले होते आणि मुख्य म्हणजे ते संघाच्या मुशीत मोठे झालेले नव्हते, त्यामुळे संघाने त्यांना त्या महत्वाच्या पदापासून दूरच ठेवणे पसंत केले आहे. काही लोक केवळ पदाच्या लालसेने इतर संघटनांमधून संघात प्रवेश करतात आणि मोठे पद मिळवतात आणि अशा व्यक्तींना संघातूनच खूप विरोध करण्यात येत आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे गुजरातच्या प्रांत प्रचारक पदावरून हटवल गेलेल्या डॉ. मनमोहन वैद्य यांची सहसरकार्यवाहपदी निवड करून संघाने संघटनेतील स्वतःचे बहुमत सुद्धा कायम ठेवण्याची काळजी घेतली आहे. डॉ. मनमोहन वैद्य हे संघातील मोठे व्यक्ती म्हणून ओळख असलेले मा. गो. वैद्य यांचे सुपुत्र आहेत. दुसरं महत्वाच म्हणजे आणखी एक सहसरकार्यावह पदी विराजमान झालेले डॉ. कृष्णगोपाल हे केंद्र सरकार आणि संघातील अधिकृत दुवा म्हणून ओळखले जातात तसेच संघातील सत्ता केंद्र अशी त्यांची ओळख आहे ते सुद्धा नागपूर ‘लॉबीचे’ समर्थक आहेत. भाजपातील मंत्रिमंडळात त्यांच्या शिफारशींवरूनच बरेचजण आज मंत्रिमंडळात आहेत. त्याहूनही महत्वाचं म्हणजे तेच नरेंद्र मोंदीच्या बदलत्या कार्यशैलीच्या तक्रारी राष्ट्रीय स्वयंसंघाकडे पोहोचवत आहेत हे महत्वाचे आहे.

मोदींपासून दूर असलेले आणि राजनाथ सिंग यांच्या जवळचे मानले जाणारे मध्य प्रदेशचे सुरेश सोनी, वी. भागय्या आणि मुकुंद सी. आर हे सर्व संघाच्या शाखेत आणि तालमीतले म्हणून ओळखले जातात ते सर्व ‘नागपूर लॉबीचे’ समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच २०१९ च्या निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संघातील वरिष्ठांनीच कंबर कसल्याचे समजते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या