23 April 2025 5:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | शेअर प्राईस 90 रुपये; तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NHPC Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, मोठी संधी आली - NSE: TATATECH RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर देऊ शकतो मोठा परतावा, या कंपनीला मोठा भविष्यकाळ - NSE: NTPCGREEN
x

तामिळनाडूमध्ये आरएसएस'ची सत्ता येऊ देणार नाही

Rahul Gandhi, Congress, DMK, Tamil Nadu, RSS

कृष्णगिरी : तामिळनाडूवर नागपूरची म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सत्ता कधीही येऊ देणार नाही, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी जाहीर केले. द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन तामिळनाडूचे लवकरच मुख्यमंत्री होतील, असा ठाम विश्वास देखील त्यांनी जाहीर सभेत व्यक्त केला.

राहुल गांधी म्हणाले की, नीरव मोदी, विजय मल्ल्यासारख्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवली आणि थेट विदेशात पळून गेले. या सर्व कर्जबुडव्यांपैकी एकही जण अजून तुरुंगात गेलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेस सत्तेवर आल्यास कर्ज न फेडता आलेल्या एकाही शेतकऱ्याला आम्ही तुरुंगात धाडणार नाही. कर्जबुडव्या श्रीमंत लोकांवर काहीही कारवाई होत नाही, परंतु त्याच गुन्ह्यापायी गरीब शेतकऱ्यांना शिक्षा सुनावली जाते हे अयोग्य आहे.

राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदी, मेहुल चोकसीला प्रत्येकी ३५ हजार कोटी रुपये व विजय मल्ल्याला १० हजार कोटी रुपये दिले आहेत. गेल्या पाच वर्षांत मोदींनी आपल्या १५ मित्रांसाठीच सरकार चालविले त्या सर्वांची नावे जनतेला माहिती आहेत. त्यामध्ये अनिल अंबानी, नीरव मोदी, मेहुल चोकसी आदींचा समावेश आहे. पुढे राहुल गांधी यांनी सांगितले की, देशातील सर्वात गरिबांतील गरिब कुटुंबांना किमान उत्पन्नाची हमी देणारी न्याय योजना ही त्या लोकांमध्ये क्रयशक्ती निर्माण करेल. अशा योजनेमुळे तामिळनाडूमध्ये नवीन कारखाने उभारले जातील तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल. तामिळनाडूमधील वस्त्रोद्योगनिर्मितीची आगारे असलेली तिरुपूर, कांचीपुरमसारखी ठिकाणे पुन्हा पहिल्यासारखीच बहरतील. त्यातून युवा पिढीसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#DMK(3)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या