नवी दिल्ली : भारतात स्मार्टफोन द्वारे होणाऱ्या गुडमॉर्निंग मेसेजेसने देशातील ३० टक्के लोकांच्या फोनची मेमरी केवळ या मॅसेज आणि फोटोमुळेच फुल होऊन जाते असं मत दुसरं तिसरं कोणी नाही तर गूगल’नं दिलं आहे.
सोशल मीडिया चा म्हणजे फेसबुक, व्हॉटसअप किंवा इतर माध्यमातून पाठवण्यात येणाऱ्या गुड मॉर्निंग, गुड नाईट, सणासुदीच्या निमित्तानं शुभेच्छा देणारे मॅसेज आणि फोटो पाठवण्याचा ट्रेन्ड गुगलनं अभ्यास करून अहवाल तयार केलाय.
या अहवालानुसार, भारतातील प्रत्येक ३ पैंकी १ स्मार्टफोन युझरची मेमरी या गुड मॉर्निंग मॅसेजेसमुळेच फुल होतेय. अमेरिकेत केवळ १० टक्के युझर्स असे आहेत ज्यांची फोन मेमरी ‘गुड मॉर्निंग’ मॅसेजेसनं भरलेली आहे.
