29 May 2023 10:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rekha Jhunjhunwala Portfolio | स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स शेअर्सने रेखा झुनझुनवाला यांची जोरदार कमाई, स्टॉक डिटल्स पहा Manipur Violence | अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार, आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू, आमदार-मंत्र्यांच्या घरावर हल्ले 50 Percent Commission | मोदींनी इव्हेन्ट केलेल्या मध्य प्रदेश उज्जैन 'महाकाल लोक' येथील महादेवाचे ६ पुतळे कोसळले, कॉट्रॅक्टर गुजरातचा निघाला Credit Card Reward Points | क्रेडिट कार्डवर तुमच्याकडून वर्षाला 10 हजार रुपये वसूल केले जातात, तुम्हाला ही ट्रिक माहित आहे? Property Knowledge | प्रॉपर्टी विकताना फक्त एवढीच रक्कम कॅशमध्ये घ्या, नाहीतर ही चूक किती महागात पडेल लक्षात घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेत डबल फायदा, फक्त व्याजाचे 1.85 लाख रुपये मिळतील Numerology Horoscope | 29 मे 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
x

मोदींचा चमत्कारी विजय ही भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत चिंतेची बाब: द वॉशिंग्टन पोस्ट

Narendra Modi, Losabha Election 2019

वाशिंग्टन डीसी: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात मोदी लाट नसताना देखील प्रत्यक्षात मोदी त्सुनामी आली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मोदींच्या या यशानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं तसेच लोकांमध्ये सुद्धा आता २-३ दिवसानंतर वेगळीच चर्चा चौकाचौकात रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने या संदर्भात एक लेख प्रसिद्ध केला आहे. भारतासारख्या विशाल लोकशाहीत मोदींचा आश्चर्यकारक विजय अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे.

या लेखात चिंता व्यक्त करताना म्हटलं आहे की, ‘या मोठ्या बहुमताला मोदी सरकार आता आर्थिक सुधारणांपेक्षा, लोकांनी हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्याला बहुमत दिल्याचा समज करून घेईल. त्यात जगावर नियंत्रण ठेवणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुद्धा भारतासोबत आर्थिक हितसंबंध प्रस्तापित करण्यावर अधिक जोर आहेत आणि त्यामुळे ते सध्या मोदींची स्तुती करण्यात मग्न आहेत. परिणामी ते देखील स्वतःच्या हितसंबंधापायी भारतातील अशा महत्वाच्या विषयांवर शांत राहणं पसंत करतील’ अशी चिंता वॉशिंग्टन पोस्टने लेखात व्यक्त केली आहे.

तसेच यात पुढे सांगण्यात आला आहे की, ‘२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मोदी आर्थिक सुधारणा आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन या प्रमुख मुद्यांवर सत्तेत आलं होतं. मात्र निकाट्याच पार पडलेल्या निवडणुकीतील प्रचारात मोदींचे प्रचारातील मुद्दे अत्यंत वेगळेच होते, ज्यामध्ये आर्थिक सुधारणा, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाई या लोकांशी निगडित प्रमुख मुद्यांना जराही महत्व देण्यात आले नाही. कारण यावेळी मोदी केवळ राष्ट्रवाद आणि जातीयवादाच्या मुद्यावर प्रचार करत होते.

यावेळी त्यांनी प्रचारात पाकिस्तानला अणुबॉम्बच्या टाकण्याच्या धमक्या देऊन मतदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. तसेच भारतीय वायुदलाने बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्यात नक्की दहशदवादी तळ उद्धवस्त झाले होते का? यांचा कोणताही पुरावा शेवटपर्यंत दिला नाही, मात्र त्याआधारेच त्यांनी राष्ट्रवादाच्या नावाने मतदारांकडून मतं मागितली, असे मुद्दे लेखात नमूद करून मोदींच्या हेतूबदद्दलच अप्रत्यक्ष संशय व्यक्त केला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1663)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x