नवी दिल्ली : भारत एनएसजीचा सदस्य होण्यास पात्र असून त्यासाठी ब्रिटनचा बिनशर्त पाठिंबा आहे. परंतु भारताच्या एनएसजी सदस्यत्वाला विरोध करण्याचं नेमकं कारण काय आहे ते स्वतः चीननं स्पष्ट करावं, असं मत सुद्धा ब्रिटनकडून नोंदवण्यात आलं आहे. एनएसजीच्या सदस्यत्वामुळे अनेक फायदे असल्यानं ब्रिटननं घेतलेली सकारात्मक भूमिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे.
तसेच या पाठिंबा देताना गटात सामील होण्यासाठी भारत पात्र असल्याचं ब्रिटननं मत व्यक्त केलं आहे. एनएसजीमध्ये सामील होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व योग्यता भारताकडे असल्याचं सुद्धा ब्रिटनने स्पष्ट केलं आहे. एनएसजीकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर अणू व्यापारावर निगराणी ठेवण्याचं काम केलं जातं. ज्याचा भविष्यात भारताला फायदा होऊ शकतो.
भारत एक प्रतिष्ठीत देश असून तो एनएसजीचा भाग असायला हवा, अशी ठाम भूमिका ब्रिटेनने घेतली आहे. तसेच भारताच्या एनएसजी प्रवेशाला विरोध करण्याचं नेमकं कारण काय आहे ते चीननं स्पष्ट करावं, असं सुद्धा म्हटलं आहे. कारण एनएसजीमधील भारताच्या प्रवेशाला चीनचा तीव्र विरोध आहे. दरम्यान, त्यासाठी काही दिवसांपूर्वी या विषयाच्या अनुषंगाने भारत आणि अमेरिकेचे दोन मंत्री भेटले होते. मात्र अद्याप तरी एनएसजी प्रवेशाबद्दल भारताला अमेरिकेकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळालेलं नाही त्यामुळे अनेक गोष्टी अधांतरी आहेत.
