मुंबई, ०१ जून | राज्याच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत राज ठाकरे यांनी त्यांचे विचार सविस्तर मांडले. यावेळी त्यांनी देशातील कोरोना स्थितीवरून देखील सविस्तर भाष्य करताना मोदी सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं. तसेच राज ठाकरे यांनी दलबदलू राजकीय नेत्यांवर देखील भाष्य केलं.

तसेच निवडणुका आल्या की, पक्षांतराची लाट येते. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते दुसऱ्या पक्षात जाताना दिसतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २००९मधील विधानसभा निवडणुकीवेळचा असाच एक किस्सा लोकसत्ता’च्या वतीने ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ कार्यक्रमात सांगितला. भाजपाचे नेते आणि मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या आमदार अतुल भातखळकरांविषयी राज ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला. आमदार अतुल भातखळकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं माझ्याकडे आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला आणि त्यांना भाजपात राहायला सांगितलं होतं,” असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर जाणाऱ्या नेत्यांविषयी बोलताना त्यांनी अतुल भातखळकरांविषयीचा गौप्यस्फोट केला. २००९ मधील विधानसभा निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते. एक लोखंडे म्हणून होते, तेही माझ्याकडे आले होते. मी नितीन गडकरींना फोन करून सांगितलं. त्यांना सांगितलं होतं की, असं करू नका. ज्या पक्षात इतकी वर्ष वाढलात, राग आला म्हणून असं करू नका. आहात तिथंच रहा, हा वेडपटपणा करू नका. हे सांगत असताना दोन माणसं तिथे होती. त्यांना उभं करू शकतो. हे असं घडतं असतं. शिवसेनेच्या सुरूवातीच्या काळातही अनेक लोक सोडून गेले,” असं राज ठाकरे म्हणाले.

 

News English Summary: Atul Bhatkhalkar of the Bharatiya Janata Party had came to me to ask for a ticket for the 2009 Assembly elections. It was like an iron, it came to me too. I called Nitin Gadkari and told him said Raj Thackeray.

News English Title: BJP leader Atul Bhatkhalkar had came to me to ask for a ticket during the 2009 Assembly elections said Raj Thackeray news updates.

२००९ मधील विधानसभा निवडणुकीवेळी भातखळकरांनी मनसेकडे तिकीट मागितलं होतं – राज ठाकरे