14 May 2025 10:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL IREDA Share Price | 49 टक्के रिटर्न मिळेल, पीएसयू शेअर मालामाल करणार, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो या फंडात पैसे गुंतवा, 16 पटीने परतावा मिळतोय, करोडोत रिटर्न मिळेल Mazagon Dock Share Price | रॉकेट तेजीत डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: MAZDOCK Reliance Power Share Price | 43 रुपयाच्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, शॉर्ट टर्ममध्ये मजबूत रिटर्न - NSE: RPOWER Suzlon Share Price | खरेदी करा सुझलॉन स्टॉक, स्वस्तात खरेदीची संधी, मिळेल जरबदस्त परतावा - NSE: SUZLON
x

धक्कादायक! राज्यात ३ महिन्यात ६१० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Devendra Fadanvis

मुंबई : यावर्षीच्या जानेवारी ते मार्च ३ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ६१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सहकार आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे. यामधली १९२ प्रकरणं जिल्हास्तरीय समितीत पात्र ठरवण्यात आली आहेत. ज्यापैकी १८२ प्रकरणी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून मदत देण्यात आली आहे. दरम्यान एकूण ९६ प्रकरणं निकषात न बसल्याने अपात्र ठरवण्यात आली. तर ३२३ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत अशी देखील माहिती देशमुख यांनी सभागृहाला दिली. सदर विषयाला अनुसरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंयज मुंडे यांनी लक्ष वेधले होते ज्यावर देशमुख यांनी सभागृहाला हे उत्तर दिले.

दरम्यान २०१५ ते २०१८ या कार्यकाळात विचार केला तर एकूण १२,०२१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची प्रकरणे शासनाच्या नोंदणीवर आली आहेत. ज्यापैकी ६,५८८ प्रकरणे निकषात असल्याने पात्र ठरवण्यात आली. सदर प्रकारणांपैकी एकूण ६,८४५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना १ लाख रूपयांची मदत देण्यात आल्याचे सभागृहाला सांगितले.

सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी स्वावलंबी मिशन आणि सन्मान योजना राबवली. असे असतानाही मागील ४ वर्षांत शेतीमालाला हमीभाव मिळाला नाही, बोंडअळी प्रादुर्भावामुळे बाधित शेतकरी वर्ग, कर्जबाजारीपणा आणि दुष्काळामुळे १२,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, हिंगोली, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात ४ हजार १२४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अशीही माहिती देशमुख यांनी दिली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या