मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरातील एकूण ७१ जागांसाठी सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील हा शेवटचा टप्पा असून यात मुंबई आणि ठाण्यासह एकूण १७ मतदारसंघांतील तब्बल ३२३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य सुमारे ३ कोटी ११ लाख मतदार ठरवणार आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत ३१.७४ टक्के मतदान झाले आहे.
दरम्यान, मुंबई-ठाण्यावरील आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पहिल्या तीन टप्प्यांतील मतदान शांततेत पार पडले असले तरी चौथ्या टप्प्यात अनेक मतदारसंघात होणाऱ्या अटीतटीच्या लढती लक्षात घेऊन आयोगाने तब्बल ८७२ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत. सोमवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली. मुंबईत सकाळी उद्योगती अनिल अंबानी, अभिनेता आमिर खान, अभिनेत्री माधुरी दीक्षित- नेने, ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, अभिनेत्री प्रियांका चोप्रा आदी कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला.
Estimated voter turnout till 3 pm for the 4th phase of #LokSabhaElections2019 is 49.53%. Voting is underway in 72 constituencies, across 9 states. pic.twitter.com/CgAII1vFyT
— ANI (@ANI) April 29, 2019
