15 February 2025 3:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Money Alert | प्रायव्हेट नोकरदारांसाठी मोठी बातमी, रु.18000 सॅलरी असणाऱ्यांच्या खात्यात 1,30,35,058 रुपये जमा होणार Loan EMI Alert | कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना 'या' महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल Horoscope Today | शनिवार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य, मेष आणि तुळ सह या राशींसाठी शनिवारचा दिवस शुभ राहील Shukra Rashi Parivartan | शुक्र अस्त आणि उदय होणार, या 3 नशीबवान राशींच्या नशिबाचा उदय होणार, तुमची राशी कोणती New Income Tax Bill | सावधान, नवीन इन्कम टॅक्स बिलचा थेट तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डवर परिणाम होणार, अपडेट लक्षात ठेवा UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या
x

Maharashtra Bandh | भाजप-मनसे बंदमध्ये सामील नसण्याचा अर्थ शेतकऱ्यांना चिरडून मारण्याच्या घटनेला त्यांचा पाठिंबा - राऊत

Maharashtra Bandh

मुंबई, 11 ऑक्टोबर | लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे बंद पाळण्यात आला. हा बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेच्या नेत्यांनी केला. मात्र, या बंदमध्ये विरोधी पक्ष भाजप तसेच मनसेने सहभाग नोंदवला नाही. याच मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी (Maharashtra Bandh) या दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली. महाराष्ट्र बंदमध्ये सामील न होणे म्हणजेच शेतकरी चिरडण्याला पाठिंबा देणे आहे, असे म्हणत राऊतांनी भाजप तसेच मनसेवर निशाणा साधला.

Maharashtra Bandh. Shiv Sena MP Sanjay Raut slammed both the parties. Not joining Maharashtra bandh means supporting crushing of farmers, says Sanjay Raut, targeting BJP and MNS :

राज्यात आज सर्व जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. मात्र या बंदला भाजप तसेच मनसेने पाठिंबा दिला नाही. यावर बोलताना राऊत यांनी दोन्ही पक्षांवर घणाघाती टीका केली. “भाजप तसेच मनसे या बंदमध्ये सहभागी झालेले नाहीत. याचाच अर्थ त्यांनी शेतकऱ्यांना ज्या प्रकार चिरडून मारलं त्या घटनेला पाठिंबा दिला आहे,” असे राऊत म्हणाले.

लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ बंद पाळला जातोय. मात्र, महाराष्ट्रातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही भाजपने केला आहे. भाजपचे हे आरोपदेखील राऊत यांनी फेटाळून लावले. “महाराष्ट्रामध्ये निसर्गाचा तडाखा बसला आहे. ते सातत्याने होत आहे. मी सरकारतर्फे नाही. मी सरकारचा सदस्य नाही. पण माझ्या माहितीनुसार औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई हे त्या भागात शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत होते,” असे राऊत म्हणाले. विरोधकांच्या आरोपांत तथ्य नसल्याचे राऊत यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Maharashtra Bandh MNS and BJP not joining Maharashtra bandh means supporting crushing of farmers.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x