कणकवली : राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप-सेना आघाडीला धोबीपछाड देत नगराध्यक्षपदासह एकूण १७ पैकी ११ जागांवर विजय मिळत कणकवली नगरपंचायतीवर निर्विवाद बहुमत मिळवले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने एकूण ११ जागांवर विजय मिळवला आहे.
कणकवलीत राणे फॅक्टर समोर भाजप – शिवसेना आघाडी टिकाव धरू शकली नाही आणि अखेर कणकवली नागरपरिषदेवर नारायण राणे यांचेच निर्विवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी भाजपचे उमेदवार संदेश पारकर यांचा पराभव केला, परंतु संदेश पारकर यांनी सुद्धा कडवी झुंज दिली. नारायण राणेंना पराभूत करण्यासाठीच शिवसेनेने येथे भाजपशी युती केली होती परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे.
एकूण १७ जागां पैकी स्वाभिमान पक्षाला एकूण ११ जागा, भाजप ३, शिवसेना ३ आणि राष्ट्रवादी १ असा निकाल लागला आहे. राणेंच्या समर्थकांमध्ये या निकालामुळे आनंदाचे वातावरण आहे.
