मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील गरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा राज्य सरकारने दिला आहे. या भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा क्षुल्क माफ करण्यात आले आहे. हा महत्वपूर्ण निर्णय राज्यसरकारने घेतला असल्याची माहिती शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विटरवरून दिली. ज्या दुष्काळग्रस्त भागात लोकांना अन्न पाण्याविना राहावे लागते. त्याच परिस्थितीत विध्यार्थी परीक्षा क्षुल्क कसे भरू शकणार यासाठी राज्यसरकारने हा निर्णय घेतला आहे.
कारण पैशाअभावी किती तरी विध्यार्थी परीक्षा देत नाहीत आणि त्यांचे नुकसान होते. महसूल भागाने दुष्काळी गावांची यादी घोषित केल्यावर या यादीत ज्या गावांची नवे असतील त्या गावातील विद्यार्थ्यांचे परीक्षा क्षुल्क माफ केले जाणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विध्यार्थ्यांना परीक्षा क्षुल्क माफ करताना या पूर्वी न होण्याऱ्या प्रात्यक्षिक, गुणपत्रिका, प्रमाणपत्र अशा सर्व क्षुल्कांसा आता सगळी फी माफ होणार आहे.
प्रत्येकवर्षी ऑनलाईन पद्धतीने थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात हि रक्कम जमा होणार असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितले आहे. राज्यसरकारच्या या निर्णयामुळे गरीब विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल व पैशाअभावी त्यांचे शिक्षण अडणार नाही.
दुष्काळी भागातील १०वी,१२वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करताना यापूर्वी माफ न झालेल्या प्रात्यक्षिक,गुणपत्रिका, प्रमाणपत्र शुल्कांसह ‘संपूर्ण शुल्क’ आता होणार माफ. प्रतिपूर्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार-शिक्षणमंत्री @ShelarAshish यांनी शासन निर्णय केला जारी pic.twitter.com/cGE8h9mB4E
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 1, 2019
