महत्वाच्या बातम्या
-
मातोश्रीवरील 'ती' डिजिटल स्क्रीन, राज ठाकरेंच्या भोवती सेनेचं पुन्हा तेच २०१४'चं मृगजळ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून वेगळं होत स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. आज मार्ग वेगवेगळे असले तरी आरोप प्रत्यारोपांच्या मार्गे अनेक गोष्टीत घडला असल्या तरी राज ठाकरे यांचे मातोश्रीवर स्थान अजून टिकून आहे असंच म्हणावं लागेल. कारण, ‘मातोश्री’वर एका डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून शिवसेनेचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये राज ठाकरेंची अनेक छायाचित्रं आहेत. निवडणुकांची चाहूल लागताच राज ठाकरेंना पाण्यात पाहणारे त्यांची जवळीक साधण्याचे अप्रत्यक्ष प्रयत्न सुरु करतात आणि एखाद्या विषयावरून चर्चा घडवून आणतात.
7 वर्षांपूर्वी -
उस्मानाबाद: शंभू महादेव साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुंभारंभ, स्थानिकांसाठी वरदान
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने कळंब तालुक्यातील शंभू महादेव साखर कारखान्याच्या हंगामाचा शुंभारंभ करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील सर्व साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालवले तर ग्रामीण भागाचे अर्थकारण कधीच कोलमडणार नाही आणि परिणामी कुठल्याने शेतकऱ्यांचे पैसे बुडणार नाहीत आणि शेतकऱ्यांची फसवणूक सुद्धा होणार नाही, असं मत राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केलं.
7 वर्षांपूर्वी -
अहंकार चाळवला? कांद्याचे पैसे मनीऑर्डर करणाऱ्या शेतकऱ्याच्या चौकशीचे आदेश
या सिजनमध्ये कांद्याला अवघा एक-दीड रुपयाचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय काल नाशिक मध्ये आला होता. २०१४ मध्ये “बहुत हुआ किसान पर अत्याचार, अब की बार मोदी सरकार” अशी घोषणा देत सत्तेत आलेल्या पंतप्रधान मोदींची या शेतकऱ्याने चांगलीच कोंडी केली होती. एकूण सात क्विंटल ५० किलो कांदा विकून मिळालेले १,०६४ रुपये संजय साठे या शेतकऱ्याने थेट मोदींना मनिऑर्डर करून पाठवले आणि ‘ठेवा तुम्हालाच’ असा थेट संदेश पंतप्रधांना दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
ब्लू-प्रिंट व्हिडिओ: राज ठाकरेंच्या कल्पनेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतात. यावर्षीच्या महापरिनिर्वाणदिनीही लाखो लोकांनी चैत्यभूमीवर उपस्थिती दर्शवली. वास्तविक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला वाचा, शिका आणि संघटित व्हा असा दीर्घकालीन संदेश दिला होता.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो! चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेवून बांधा : मंत्री राम शिंदे
जर तुमच्याकडे जनावरांसाठी चारा नसेल तर तुमची जनावरे पाहुण्यांकडे जाऊन बांधा, असा विचित्र सल्ला राज्याचे जलसंधारण मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी स्थानिक शेतकऱ्यांना दिला आहे. त्यांच्यावर समाज माध्यमांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राम शिंदेंचा तो व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमांवर खूप व्हायरल होताना दिसत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी उमटली आहे.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: राम मंदिर; नक्की कोण कॉपी करतंय? राज मार्चमध्ये म्हणाले होते, तर प्रकाश आंबेडकर महिन्यापूर्वी
सध्या लोकसभा निवडणूक जवळ येताच राम मंदिराच्या राजकारणाने जोर धरला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना डोकं नाही, आणि ते माझीच कॉपी करत आहेत, अशी टीका भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान, राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केवळ मराठा समाजाची मते मिळवण्यासाठीच मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला, असे ते प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: मराठा आरक्षणात दगा होणार? शहांच्या तोंडून कायद्याचं अप्रत्यक्ष बिंग फुटलं?
देवेंद्र फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाला अधिकृत मान्यता दिली असली तरी अमित शहांच्या तेलंगणातील भाषणादरम्यान एकप्रकारे घटनात्मक आणि न्यायालयीन बिंग फुटल्याची शंका प्रसार माध्यमांवर व्यक्त होऊ लागली आहे. अनेक घटनातज्ञांच्या मतानुसार मराठा आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर ठाम पणे टिकण्यासाठी ते ओबीसीमध्येच नवा प्रवर्ग करून देणे गरजेचे होते. तसेच त्यासाठी ओबीसींच्या एकूण राखीव कोटय़ामध्येच वाढ करून, त्यासाठी भारताच्या संसदेत अधिकृतपणे कायदा करणे गरजेचे होते.
7 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात भाजप पदाधिकाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदार विद्या चव्हाण यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांच्या फेसबुकवर माहिती देणारी एक पोस्ट टाकली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी लाटेतील शिवसेना खासदार विनायक राऊतांना २०१९ ची लोकसभा अवघड?
एनसीपीचे सर्वेसेवा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या दरम्यान कणकवली येथे दीर्घकाळ चर्चा झाली. दरम्यान, सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये ‘तुझ्यागळा माझ्यागळा’ सुरु झाल्याने नारायण राणे यांना युती होणार असल्याची खात्री आहे. तसे झाल्यास रत्नागिरी मतदारसंघ पुन्हा शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश यांनी हे या मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने लोकसभा लढवणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, त्यांना राष्ट्रवादीने सुद्धा पाठिंबा द्यावा आणि त्या मोबदल्यात निलेश राणे केंद्रात राष्ट्रवादीला सर्मथन करून त्यांच्या समर्थक खासदारांच्या संख्येमध्ये भर टाकतील असा समझोता झाल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण कायद्यात टिकणे अवघड, स्वतंत्र आरक्षण केवळ शब्दखेळ : माजी न्या. पी. बी. सावंत
समस्त मराठा समाजाला महाराष्ट्र सरकारने दिलेले आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर ठाम पणे टिकण्यासाठी ते ओबीसीमध्येच नवा प्रवर्ग करून देणे गरजेचे होते. तसेच त्यासाठी ओबीसींच्या एकूण राखीव कोटय़ामध्येच वाढ करून, त्यासाठी भारताच्या संसदेत अधिकृतपणे कायदा करणे गरजेचे होते, असे प्रामाणिक मत माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी प्रसार माध्यमांकडे व्यक्त केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण : महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल
महाराष्ट्रात समस्त मराठा समाजाला १६ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याच्या निर्णयाची घोषणा झाली आहे. त्यानंतर अधिकृतपणे त्याचे विधेयक आणि अधिसूचना सुद्धा राज्य सरकारकडून काढली गेली आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा केला असताना देखील त्याविरुद्ध काही लोकं व संस्था करतात आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करू लागले आहेत. त्यामुळे राज्य सरकार खडबडून जागं झालं असून महाराष्ट्र सरकारकडून आज सुप्रीम कोर्टात रीतसर कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या 'पंचायतीतील' कट्टर मराठी बाण्यामुळे शिवसेनेची मराठी मंतांची पंचायत?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई कांदिवली येथे उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लावत स्वतःची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, उत्तर भारतीयांच्या बाबतीत ते नेमकी कोणती भूमिका मांडतात यावर प्रसार माध्यमं आणि सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. भाषणातील मराठीचा हिंदीत अनुवाद करताना चुकीची माहिती हिंदी भाषिक राज्यांमध्ये प्रसारित केली जाते, त्यामुळे त्यांनी हा संवाद देशभर समजावा म्हणून हिंदीत भाषण केले.
7 वर्षांपूर्वी -
उत्तर भारतीय पंचायत: राज ठाकरे दिसत होते त्यापेक्षाही खूप कट्टर मराठी असल्याचे सिद्ध झाले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई कांदिवली येथे उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लावत स्वतःची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, उत्तर भारतीयांच्या बाबतीत ते नेमकी कोणती भूमिका मांडतात यावर प्रसार माध्यमं आणि सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. भाषणातील मराठीचा हिंदीत अनुवाद करताना चुकीची माहिती हिंदी भाषिक राज्यांमध्ये प्रसारित केली जाते, त्यामुळे त्यांनी हा संवाद देशभर समजावा म्हणून हिंदीत भाषण केले.
7 वर्षांपूर्वी -
मंदिर बांधण्यापेक्षा गरीबाच्या तोंडात दोन घास गेले तर मला आवडेल : नाना पाटेकर
राज्याचा ग्रामीण भाग सध्या प्रचंड दुष्काळाने ग्रासला आहे आणि मराठवाड्यात तर परिस्थिती फारच कठीण आहे. त्यामुळे मराठवाड्यात जर एक मूठ धान्य व एक पेंडी चारा सर्वांनी दिला तर मराठवाड्यातील जनावरांना आणि होरपळणाऱ्या माणसांना मोठा हातभार लागेल. केवळ नाइलाजास्तव ग्रामीण भागातील लोकं आज मोठ्याप्रमाणावर शहरात येत आहेत, ती काही भिकारी नाहीत. त्यामुळे त्यांना भिक्षुकांसारखी वागणूक अजिबात देऊ नका, असे जाहीर आवाहन नाना पाटेकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना केले.
7 वर्षांपूर्वी -
घोषणाबाज युती सरकारला शिर्डी संस्थानकडून बिनव्याजी कर्ज घेण्याची वेळ
नुकत्याच आलेल्या या बातमीने सरकार किती आर्थिक संकटात आहे याची चुणूक लागली आहे. कारण आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने शिर्डीतील साई संस्थानकडून तब्बल ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेतलं आहे. दरम्यान, हा निधी राज्य सरकार तर्फे अपूर्ण असलेल्या निळवंडे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरणार असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
फेक इन इंडिया? सवलत सोडून उलट उद्योगांची वीज १५-२० टक्क्यांनी महागली
केंद्र आणि राज्य सरकारने मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया यांसारख्या योजनांचा कितीही गाजावाजा केला तरी वास्तव मात्र वेगळंच समोर येत आहे . सरकारच्या नव्या नियमानुसार राज्यातील उद्योगांवर वीज कोसळली आहे. कारण विजेचे दर तीन ते सात टक्क्यांनी वाढविल्याचे राज्य महावितरणकडून भासविले जात असले तरी सादर विषयाला अनुसरून बदल करताना औद्योगिक वीज ग्राहकांना मिळणारा ‘पॉवर फॅक्टर इन्सेन्टिव्ह’ सरकारने हुशारीने हिसकावून घेतला असून, उलटपक्षी ‘पॉवर फॅक्टर पेनल्टी’ लादल्याने उद्योगांची वीज तब्बल पंधरा ते वीस टक्क्यांनी महागली आहे असं सत्य समोर येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
कांद्याला एक-दीड रुपया भाव, शेतकऱ्याने तो विकून सगळे पैसे मोदींना 'मनीऑर्डर' केले
या सिजनमध्ये कांद्याला अवघा एक-दीड रुपयाचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय काल नाशिक मध्ये आला आहे. २०१४ मध्ये “बहुत हुआ किसान पर अत्याचार, अब की बार मोदी सरकार” अशी घोषणा देत सत्तेत आलेल्या पंतप्रधान मोदींची या शेतकऱ्याने चांगलीच कोंडी केली आहे. एकूण सात क्विंटल ५० किलो कांदा विकून मिळालेले १,०६४ रुपये संजय साठे या शेतकऱ्याने थेट मोदींना मनिऑर्डर करून पाठवले आणि ‘ठेवा तुम्हालाच’ असा थेट संदेश पंतप्रधांना दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठवाडा: दुष्काळाचा पहिला बळी; गळणारे पाणी भरताना महिलेचा टँकरखाली मृत्यू
राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे आणि संपूर्ण ग्रामीण भाग त्यात संकटात सापडला आहे. त्यात मराठवाड्यात परिस्थिती अतिशय भीषण असून अनेक गावांमध्ये तब्बल १५ ते २० दिवसांनी पाण्याचा टँकर येत असल्याने अनेक दुर्घटना घडण्यास सुरुवात झाली आहे. गावात पाण्याचा टँकर आला की, पाणी स्थानिकांची मोठ्या प्रमाणावर झुंबड उडते आणि त्यातून भांडणण आणि मारामाऱ्या होण्याइतपत परिस्थिती भयाण झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण: अखेर राणे समितीच्या 'त्या' अभ्यासापूर्ण निष्कर्षामुळेच आरक्षण : सविस्तर
मराठा समाजातील आंदोलकांचे लाखोंचे मोर्चे, १४,६०० मराठा तरुणांवर अनेक खटले आणि दुःखाची बाब म्हणजे त्यासाठी ४२ तरुणांच्या प्राणाचे बलिदान असा दीर्घ मन हेलावणारा प्रवास केल्यानंतर अखेर शुक्रवारी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. आज भाजप आणि शिवसेना स्वतःची पाठ थोपटून किती ही मार्केटिंग करत असले तरी साडेचार वर्षापूर्वी आघाडी सरकारच्या राजवटीत नारायण राणे समितीने सखोल अभ्यासाद्वारे हे निष्कर्ष मांडले होते, ज्याद्वारे मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते, वास्तविक त्याच धर्तीवर मागासवर्ग आयोगाने १६ टक्केच आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेने केवळ कॉपीपेस्ट एकदाच काय तो ४ वर्ष रखडवलेला अहवाल निवडणुकीच्या तोंडावर शब्दांचा खेळ करत स्वीकारला.
7 वर्षांपूर्वी -
गृहमंत्री पद (राज्य) शिवसेनेकडे असून उद्धव ठाकरेंची गृहखात्यावर टीका
केंद्रात आणि राज्यात सत्तेत सामील असलेल्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपवर गृहखात्याच्या निष्क्रियतेवरून सामना मुखपत्रातून निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे कोकणातील आमदार दीपक केसरकर यांच्याकडे गृह राज्यमंत्री पद आहे याचा सुद्धा त्यांना विसर पडल्याचे दिसत आहे. गृहखात्याच्या कारभारावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की,’राज्यात २०१४ पासून पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाली असून हा गृहखात्याचा पराभव आहे’, असे म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS