24 April 2024 7:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

भाजपने कामंच केली नसल्याने महाजनादेश यात्रेत मोठा पोलिस बंदोबस्त: खासदार डॉ. अमोल कोल्हे

Mahajanadesh Yatra, BJP, Devendra Fadnavis, MP Amol Kolhe, NCP, Shivswarajya Yatra

पाथरी : शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी पाथरी येथील राष्ट्रवादीच्या यात्रेत भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पदवीची देखील यावेळी अमोल कोल्हेंनी खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळालं. सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महाजानदेश यात्रेवर देखील अमोल कोल्हे यांनी भाष्य करत फडणवीसांवर टीकास्त्र सोडले.

उपस्थितांना संबोधित करताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्षाने कामंच केली नाही म्हणून महाजनादेश यात्रेत पोलिस बंदोबस्त ठेवावा लागत आहे’. मुख्यमंत्री शिक्षणाने एमबीए आहेत. मात्र त्यांच्या पदवीचा आदर करुन सांगतो आज ती पदवी म्हणजे ‘महाबोलबच्चन यात्रा’ झाली आहे अशी जोरदार टीका यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आणि मुख्यमत्र्यांचं महाजानदेश यात्रेची पोलखोल केली.

दरम्यान पाथरीच्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या धोरणांवर टीका केली, खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, १६ हजार भगिनींच्या कपाळावरचे कुंकु पुसले गेले आहे, मग मुख्यमंत्री कुणावर ३०२ चा गुन्हा कुणावर दाखल करायचा असा सवाल करत प्रत्येक बाबतीत बळीराजाच्या तोंडाला पाने सरकारने पुसलीय अशी जोरदार टीका केली.

प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम विद्यमान सरकार करत आहे.त्यांना शेतकऱ्यांच्या भावनेचं काहीही देणेघेणे नाही. आज आपण सुपात आहोत उद्या मंदीमुळे जात्यात जाणार आहोत हे लक्षात घ्या असे आवाहनही डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. तसेच सरकारच्या विरोधात कोण बोलायला कोण लागलं की लगेच सीबीआय, ईडीचा घडीबुवा अंगावर सोडला जातोय. सध्या हुकुमशाही सुरु आहे हे लक्षात घ्या असा इशाराही कोल्हेंनी दिला.

हॅशटॅग्स

#AmolKolhe(14)#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x