रेल्वेमंत्री रात्रभर उगाचच ट्विट करत होते, इथे रात्री ९ नंतर झोप महत्वाची - आ. भातखळकर
मुंबई, २५ मे : स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून आता केंद्र आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आज दुपारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्रालय महाराष्ट्राची तयारी असूनही कमी रेल्वेगाड्या सोडत असल्याची तक्रार केली होती. उद्धव ठाकरे यांचा हा आरोप रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे पियूष गोयल यांनी आज संध्याकाळी ट्विट करुन रेल्वे मंत्रालय सोमवारी महाराष्ट्रात १२५ ट्रेन पाठवायला तयार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी तासाभरात महाराष्ट्र सरकारने रेल्वे प्रबंधकांकडे मजुरांची यादी व इतर तपशील पाठवावा, असे गोयल यांनी सांगितले होते.
मात्र, राज्य सरकारने यावर कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे पियूष गोयल यांनी पुन्हा ट्विट करून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या ट्विटमध्ये गोयल यांनी म्हटले आहे की, दीड तास उलटून गेला तरी महाराष्ट्र सरकारने उद्या सोडण्यात येणाऱ्या १२५ श्रमिक ट्रेनसाठी आवश्यक तपशील पुरवलेला नाही. ही माहिती मिळाल्यानंतर या ट्रेन्सचे नियोजन करायला वेळ जातो. आम्हाला गेल्यावेळप्रमाणे महाराष्ट्रातून रिकाम्या रेल्वे परत आणायच्या नाहीत. त्यामुळे नियोजन न करता या निर्णयाची अंमलबजावणी करणे शक्य नाही, असेही गोयल यांनी म्हटले आहे.
यावरून राज्यातील भाजप नेत्यांनी राज्य सरकारला लक्ष केलं आहे. भाजपचे मुंबईतील आमदार अतुल भातखळकर यांनी याच विषयाचा धागा पकडून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “रेल्वे मंत्री पियुष गोयल रात्रभर उगाचच ट्विट करत होते, उत्तराची वाट पहात होते…तिथे रात्री ९ नंतर ट्विट बघतेय कोण? झोप वैगेरे काही प्रकार आहे की नाही?
रेल्वे मंत्री @PiyushGoyal रात्रभर उगाचच ट्विट करत होते, उत्तराची वाट पहात होते…
तिथे रात्री 9 नंतर ट्विट बघतेय कोण? झोप वैगेरे काही प्रकार आहे की नाही?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 25, 2020
या टीकेमुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोना आपत्तीत लोकांचा जीव जातं असताना हा संघर्ष पाहून सामान्य लोकांमध्ये देखील चिढ वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.
News English Summary: BJP’s Mumbai MLA Atul Bhatkhalkar has taken up the issue and castigated the state government. MLA Atul Bhatkhalkar while tweeting said, “Railway Minister Piyush Goyal was tweeting all night long, waiting for reply … Who is watching the tweet after 9 pm? Is there any other type of sleep or not?
News English Title: BJP Mumbai MLA Atul Bhatkhalkar slams State Government over Railway and Migrants issue News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?