21 March 2023 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | होय! हेच ते 10 मल्टिबॅगर शेअर्स! फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा देऊन श्रीमंत करत आहेत Gold Price Today | बाब्बो! आजही सोन्याचे नवे दर ऐकून थक्क व्हाल, तुमच्या शहरात 10 ग्रॅम सोन्याचा नवा दर कितीवर पोहोचला? Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण? Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...? Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा
x

रेल्वेमंत्री रात्रभर उगाचच ट्विट करत होते, इथे रात्री ९ नंतर झोप महत्वाची - आ. भातखळकर

BJP MLA Atul Bhatkhalkar, CM Uddhav Thackeray

मुंबई, २५ मे : स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून आता केंद्र आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आज दुपारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्रालय महाराष्ट्राची तयारी असूनही कमी रेल्वेगाड्या सोडत असल्याची तक्रार केली होती. उद्धव ठाकरे यांचा हा आरोप रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे पियूष गोयल यांनी आज संध्याकाळी ट्विट करुन रेल्वे मंत्रालय सोमवारी महाराष्ट्रात १२५ ट्रेन पाठवायला तयार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी तासाभरात महाराष्ट्र सरकारने रेल्वे प्रबंधकांकडे मजुरांची यादी व इतर तपशील पाठवावा, असे गोयल यांनी सांगितले होते.

मात्र, राज्य सरकारने यावर कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे पियूष गोयल यांनी पुन्हा ट्विट करून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या ट्विटमध्ये गोयल यांनी म्हटले आहे की, दीड तास उलटून गेला तरी महाराष्ट्र सरकारने उद्या सोडण्यात येणाऱ्या १२५ श्रमिक ट्रेनसाठी आवश्यक तपशील पुरवलेला नाही. ही माहिती मिळाल्यानंतर या ट्रेन्सचे नियोजन करायला वेळ जातो. आम्हाला गेल्यावेळप्रमाणे महाराष्ट्रातून रिकाम्या रेल्वे परत आणायच्या नाहीत. त्यामुळे नियोजन न करता या निर्णयाची अंमलबजावणी करणे शक्य नाही, असेही गोयल यांनी म्हटले आहे.

यावरून राज्यातील भाजप नेत्यांनी राज्य सरकारला लक्ष केलं आहे. भाजपचे मुंबईतील आमदार अतुल भातखळकर यांनी याच विषयाचा धागा पकडून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “रेल्वे मंत्री पियुष गोयल रात्रभर उगाचच ट्विट करत होते, उत्तराची वाट पहात होते…तिथे रात्री ९ नंतर ट्विट बघतेय कोण? झोप वैगेरे काही प्रकार आहे की नाही?

या टीकेमुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोना आपत्तीत लोकांचा जीव जातं असताना हा संघर्ष पाहून सामान्य लोकांमध्ये देखील चिढ वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

News English Summary: BJP’s Mumbai MLA Atul Bhatkhalkar has taken up the issue and castigated the state government. MLA Atul Bhatkhalkar while tweeting said, “Railway Minister Piyush Goyal was tweeting all night long, waiting for reply … Who is watching the tweet after 9 pm? Is there any other type of sleep or not?

News English Title: BJP Mumbai MLA Atul Bhatkhalkar slams State Government over Railway and Migrants issue News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x