मुंबई, २ नोव्हेंबर: महाराष्ट्र वाढीव वीज बिलांवरून सामान्य लोकांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच झळ बसली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सामान्य लोकांमध्ये सरकार आणि वीज पुरवठा कंपन्यांविरोधात रोष पाहायला मिळाला होता. विशेष म्हणजे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वाधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यासाठी अनेक आंदोलनं तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची देखील भेट घेतली होती.

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन लक्ष घालण्याची विनंती केली होती. मात्र त्यानंतर स्वतः राज्यपालांनी शरद पवार यांच्याशी यासंदर्भात संपर्क करण्याचा सल्ला राज ठाकरे यांना दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासोबत देखील फोनवर चर्चा करून पुढाकार घेण्यास विनंती केली होती.

दरम्यान यासर्व चक्रातून सामान्य ग्राहकांची सुटका होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे. कारण या प्रश्नावर लवकरच दिलासा मिळेल असे संकेत स्वतः ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin raut) यांनी दिले आहेत. त्यामुळे दिवाळी पूर्वी सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात ऊर्जामंत्री म्हणाले, वाढीव वीज बिल संदर्भात मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन आला होता आणि अर्थ खात्याकडे फाईल गेली आहे, अर्थमंत्री अजित पवार कोरोना आता कोरोना मुक्त झाल्याने ते येताच सदर विषयावर निर्णय होईल. परंतु दिवाळी आधी लोकांना दिलासा मिळेल असे सकारात्मक संकेतही ऊर्जा मंत्री नियतन राऊत यांनी दिले आहेत.

 

News English Summary: Maharashtra’s rising electricity bills have hit everyone from the common man to the rich. So the last few days have seen anger among the general public against the government and power supply companies. It is noteworthy that in this context, Maharashtra Navnirman Sena was seen to be the most aggressive and for this many agitations and also met Energy Minister Nitin Raut.

News English Title: Energy Minister Nitin Raut gave positive message for electricity bills news updates.

राज्यपाल राज भेट सामान्यांना फलदायी | वीज बिलाबाबत ऊर्जा मंत्र्यांकडून दिवाळीपूर्वीच