मुंबई, ३१ जुलै : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पहिल्या सत्रात राज ठाकरे यांनी आपलं व्हिजन मांडलं आणि त्यात राज ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. ज्या सरकारमध्ये एकोपा नसतो एकमेकांना विचारलं जात नाही ते जास्त काळ टिकणार नाही, असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सरकारच्या कामकाजावर टीका केली. “लॉकडाउन हटवून सर्व सुरळीत केलं जावं. राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना याविषयी घेणं देणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा,” असंही ते म्हणाले.

“महाविकास आघाडीच्या सरकारच्या तीन पक्षांमध्ये एकोपा नाही. त्या सरकारमध्ये एकमेकांना विचारलं जात नाही. त्यामुळे ते सरकार फार काळ टिकणार नाही,” असं राज ठाकरे म्हणाले. “मुख्यमंत्री हे शासकीय पदावर आहेत. त्यांनी बाहेर पडून काम केलंच पाहिजे. मला गेले काही महिने मुख्यमंत्री केवळ टिव्हीवरच दिसले. त्यांचा कारभार दिसलाच नाही. आता कुठे ते कामकाजाला सुरूवात करत आहेत. त्याबद्दल काही अधिक बोलावंस वाटत नाही,” असं ते यावेळी म्हणाले.

 

News English Summary: I do not think the Mahavikas Aghadi government will last long. MNS chief Raj Thackeray said that a government which does not have unity and does not ask each other will not last long.

News English Title: I do not think the Mahavikas Aghadi government will last long said Raj Thackeray News Latest Updates.

एकोपा नसल्याने हे महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही – राज ठाकरे