29 March 2024 4:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

'हीच ती वेळ, नवा महाराष्ट्र घडवायची’, मग ५ वर्ष झोपले होते काय? राज ठाकरे

Raj Thackeray, Aaditya Thackeray, Tejas Thackeray, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा शिवसेना आमदार अनिल परब यांनी बोलून दाखवल्यानंतर युवासेनेला स्फुरण चढलं होतं. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी पोस्टरबाजी करण्यात आली होती. संपूर्ण वरळी परिसरात आदित्य ठाकरे यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. ‘हीच ती वेळ आहे , नवा महाराष्ट्र घडवायची’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. मागील ५ वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना सत्ताकाळ विसरून पुन्हा ‘हीच ती वेळ, नवा महाराष्ट्र घडवायची’ अशी बॅनरबाजी करू लागल्याने त्यांची खिल्ली उडविण्यात येत आहे.

हीच ती वेळ म्हणता तर गेली पाच वर्षे काय करत होता? हीच ती वेळ म्हणण्याचा अधिकार मला आहे. कारण सरकार तो अधिकार गमावून बसले आहे. नोकऱ्या मिळतील, बँकांची कामं सुरळीत होतील, पण त्यासाठी सरकारवर अंकुश हवा. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मत द्या, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. ‘मी कोणतंही आंदोलन अर्धवट सोडलेलं नाही. रेल्वे भरतीसाठी आंदोलन केलं, रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाले हटवले, पोलिसांसाठी रस्त्यावर उतरलो, मराठी सिनेमे, मराठी माणसांसाठी आंदोलने केली. मनसेने ही आंदोलनं केली,’ असं राज म्हणाले. मागाठणे येथील सभेत ते बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रचाराच्या अखेरच्या रविवारीही मुंबईत प्रचाराचा सपाटा लावला.

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी आरे वृक्षतोडीवरून शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यांनी सरकारने एका रात्रीतून आरेतील २७०० झाडं तोडली. मात्र, त्यानंतर आलेल्या शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आरेवर एक शब्दही नाही. उद्धव ठाकरे आता निवडणुकीत निवडून आलो, तर आरेला जंगल घोषित करण्याचं आश्वासन देतात. पण निवडून आल्यावर ते गवत लावून जंगल घोषित करणार आहे का? अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका केली.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x