16 April 2024 9:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
x

आपत्ती व्यवस्थापनाचा एवढा अनुभव असेल तर घेऊन जा त्यांना हुआन, इटली, स्पेनला...भाजपला झोडपलं

Yuva Sena Leader Varun Sardesai, BJP MLA Niranjan Davkhare, Corona Crisis

मुंबई: राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत असून रुग्णांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी संसर्ग कमी करणे आवश्यक आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवले तर हे शक्य होणार आहे. यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

सदर बैठकीत राज्यातील शासकीय कार्यालय एक दिवसाआड पध्दतीने रोज ५० टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील. तसेच रेल्वे, एसटी बसेस, खासगी बसेस आणि मेट्रो या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के प्रवासी या क्षमतेने चालवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कोरोनच्या आपत्तीमध्ये सरकारी पातळीवर अनेक उपाय केले जातं असून त्यासाठी बैठकांचा देखील सपाटा लागल्याचं पाहायला मिळत आहे. स्वतः मुख्यमंत्री त्याबाबत सामान्यांना प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सतर्क करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना ही आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय आपत्ती असून त्याचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकसंघ राहून सरकारी यंत्रणांना सहकार्य करणं हाच उत्तम उपाय आहे.

मात्र यावर देखील भाजपचे आमदार राजकारण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुभवावर बोट ठेवून, अनुभवी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्याला गरज असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांना गेल्या पावसाळ्यात उदभवलेल्या पूर परिस्थितीत अनुभवी फडणवीसांनी काय दिवे लावले होते ते सर्व महाराष्ट्राने अनुभवल्याचा विसर पडला असावा.

दरम्यान, युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी मात्र आमदार निरंजन डावखरे यांना ट्विट करून शालजोडीतले हाणल्याच पाहायला मिळत आहे. वरुण सरदेसाई यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘ह्या असल्या राजकारण्यांना पहिले quarantine केले पाहिजे. काय उपयोग शिक्षणाचा जर शहाणपण नसेल? एवढाच अनुभव आहे आपत्ती व्यवस्थापनात तर घेऊन जा तुमच्या नेत्यांना Wuhan, Spain किंवा Italy मध्ये……तसेही जगातला सर्वात मोठा पक्ष आहे तुमचा.

 

News English Summery:  Corona disasters are taking a number of measures at the government level, and meetings for this are also seen. The Chief Minister himself is seeing that the media is alerting the people through the media. Corona is an international and national disaster and the best way for everyone to work together is to co-operate with the government. However, it is also seen that BJP MLAs are doing politics. BJP Legislative Council MLA Niranjan Davkhare has said that the state needs the veteran former Chief Minister Devendra Fadnavis, putting his finger on Chief Minister Uddhav Thackeray’s experience of disaster management. Meanwhile, Maharashtra MLA Niranjan Dawakhare may have forgotten all the experiences of the veteran Fadnavis in the flood situation which had brought them light. Meanwhile, Yuva Sena leader Varun Sardesai, has slammed over tweet to BJP MLA Niranjan Dawakhare.

 

News English Title: Story Yuvasena Leader Varun Sardesai slams BJP MLA Niranjan Davkhare over statement regarding Corona crisis management News latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x