सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आला होता, जेव्हा स्थानिक भाजप नेत्यांनी मोदींना सभेला आणू नका अशी विनंती केली होती. सध्या देशातील या ५ प्रमुख राज्यांमधील जनतेने मोदी आणि अमित शहांना अक्षरशः नाकारलं आहे. त्यामुळे काही दिवसात भाजपमध्ये मोदी-शहा हटाव मोहीम सुरु झाल्यास आश्चर्य वाटायला नको असं राजकीय तज्ज्ञांना वाटत आहे.

दरम्यान, पप्पू-पप्पू करत भाजपने ज्या राहुल गांधींना हिणवलं त्यांनीच आज सर्व भाजपाला आणि विशेष करून मोदी तसेच अमित शहा यांना चांगलाच धडा शिकवल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये पक्ष फुटी झाल्यास आश्चर्य मानायला नको असं म्हटलं जात आहे.

5 states assembly result shows negative environment about modi and amit shah