मुंबई : शिवसेनेनं एकला चलो रे ची भूमिका घेतल्यावर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही त्याला जशासतसे प्रतिउत्तर दिले आहे. तर दुसरीकडे दावोस मध्ये असलेल्या फडणवीस यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की ”खरंतर आमची युतीचीच भूमिका होती, पण शिवसेना स्वबळाची भाषा करत असेल तर आम्ही ही २०१९ ला लोकसभा आणि विधानसभां स्वतंत्र लढण्यासाठी तयार आहोत. पुठे ते असेही म्हणाले की महाराष्ट्रातील जनताही तयार आहे कारण शेवटी नुकसान हे शिवसेनेचेच होईल.
तर दुसरीकडे पुण्याचे खासदार काकडे म्हणाले की मोदींच्या करिष्म्यामुळेच सेनेचे उमेदवार निवडून आले आणि आता २०१९ ला लोकसभा स्वतंत्र लढलो तर भाजपचे २८ खासदार आणि सेनेचे केवळ ५ खासदारच निवडून येतील. तर विधानसभा स्वतंत्रपणे लढल्यास भाजपचे तब्बल १६५ आमदार निवडून येतील असे ही काकडे पुढे म्हणले.
खरतर आमची युतीचीच भूमिका होती. पण शिवसेना स्वबळाची भाषा करत असेल तर 2019 च्या लोकसभा, विधानसभांसाठी भाजप ही तयार आहे. महाराष्ट्रातील जनताही तयार आहे. नुकसान त्यांचेच होईल. pic.twitter.com/6ZNcW5x7tB
— ashish shelar (@ShelarAshish) January 23, 2018
