ग्वालियर : मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे स्वर्गीय. अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थीचं विसर्जन करण्यात आलं त्यावेळी वाजपेयींचे कुटुंबीय सुद्धा पोहोचले होते. परंतु त्यांना येथे वेगळ्याच अडचणींचा सामना करावा लागला. वाजपेयींच्या अस्थीचं विसर्जन झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना रस्त्यावर उभं राहून बराचवेळ रिक्षाची वाट पाहावी लागली.

त्यानंतर बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना घरी परतण्यासाठी रिक्षा मिळाली. त्यानंतर वाजपेयींची भाची कांती मिश्रा यांनी खंत आणि कटू अनुभव सांगितला की, ‘जे चारचाकीवाले होते ते आपापल्या गाडीने पोहोचले. आम्ही रिक्षावाले असल्याने रिक्षाने आलो’. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं ग्लावियर येथे एक जुनं घर असून तिथे त्यांची भाची कांती मिश्रा, त्यांचे पती ओपी मिश्रा तसेच मुलगी कविता यांच्यासहित इतर नातेवाईक वास्तव्यास आहेत. याच कुटुंबाने आज भाजपच्या चारचाकी’वाल्या नेत्यांचा कटू अनुभव आला आहे.

वाजपेयींच्या अस्थी विसर्जन विधी झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंहदेखील वाजपेयींच्या घरी पोहोचले होते. मात्र घरात कोणीच उपस्थित नव्हतं. कारण त्यावेळी सर्व कुटुंबीय घरी परतण्यासाठी रस्त्यात रिक्षाची वाट पाहत उभे होतं. त्यामुळे वाजपेयींच्या कुटुंबीयांचा बराच वेळ रस्त्यावर रिक्षाची वाट पाहण्यात गेल्याने सर्व लोकं घरी पोहोचले तरी स्वतःला घरी परतण्यासाठी स्वतःची गाडी नसल्याने रिक्षाने परतण्यास बराच वेळ गेला आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा वायरल होत आहे.

Atal Bihari Vajapeeyis family returned to home by auto because they do not have 4 wheeler like bjp leaders