20 April 2024 8:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मोदींना सभागृहात सेनेच्या खासदारांनी नमस्कार केल्यास ते पाहतसुद्धा नाहीत: खासदार कीर्तीकर

नागपूर : पंतप्रधान मोदींना सभागृहात सेनेच्या खासदारांनी नमस्कार केल्यास ते पाहतसुद्धा नाहीत असा थेट आरोप शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी मोदींच नाव घेऊन केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांना नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते हे शिवसेनेचे नेते सुद्धा उघड बोलू लागले आहेत.

शिवसेना केंद्र तसेच राज्य सरकारमध्ये सहभागी असली तरी केंद्रात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला नेहमी दुय्यम स्थान देतात असं म्हटलं आहे. सध्या आम्ही भाजप सोबत असलो तरी भविष्यात मात्र शिवसेना हा अपमान कदापि सहन करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार तसेच पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मांडली.

खासदार गजानन कीर्तिकर सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असल्याने नागपुरात शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक तसेच मेळावा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी दिल्लीतील वास्तव आणि भावना कार्यकर्त्यापुढे मांडत असताना हा खुलासा केला. सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर खासदार गजानन कीर्तीकर विदर्भातील अनेक मतदारसंघांना भेट देणार आहेत.

पुढे मेळाव्यादरम्यान त्यांनी सांगितलं की, मोदींच्या या एककल्ली कारभाराचा केवळ शिवसेनेलाच नव्हे तर अकाली दल, टीडीपी या सरकारमधील प्रादेशिक पक्षांनाही आला आणि म्हणूनच टीडीपी अखेर सरकार बाहेर पडले. मित्रपक्षांना दुय्यम वागणूक सहन होत नसल्यानेच प्रादेशिक पक्ष भाजपपासून वेगळे होत आहेत. त्यामुळे आगामी २०१९ ची निवडणूक भाजपसाठी फार कठीण असल्याचं मत व्यक्त करताना आता मोदी लाट केव्हाच संपली आहे असं विधान केलं.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x