18 February 2025 6:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | खुशखबर, आता महिना अवघ्या 250 रुपयात म्युच्युअल फंडातून पैसा वाढवा, SBI जन-निवेश SIP योजना लाँच EPFO Pension Money | खाजगी कंपनी पगारदारांना महिना 7500 रुपये ईपीएफ पेन्शन मिळणार, अपडेट जाणून घ्या BEL Share Price | डिफेन्स शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: RELIANCE GTL Share Price | 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, जीटीएल कंपनी पेनी स्टॉक फोकसमध्ये Horoscope Today | मंगळवार 18 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा मंगळवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, 22 फेब्रुवारीपासून या 3 राशींसाठी चांगला काळ सुरु होणार, तुमची राशी आहे का?
x

रामदास कदमांना खासदार खैरेंशी असलेले मतभेद पडले महागात.

औरंगाबाद : नामकरण वादावरून रामदास कदम यांचे शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी खटके उडाल्याने पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना औरंगाबादचं पालकमंत्रिपद सोडावं लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. रामदास कदम आता नांदेडचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले असून औरंगाबादची जवाबदारी दिपक सावंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. अशी सूचना खुद्द शिवसेना पक्षप्रमुखानीच केल्यामुळे आज राज्य सरकारने तसे फेरबदलाचे आदेश काढले आहेत.

नक्की हा वाद आहे तरी काय ते जाणून घेऊया ;

औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरेंनी बऱ्याच वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर व्हावं असा मुद्दा उचलून धरला आहे. परंतु सध्या मोठ्याभावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपने या नामकरणाचं श्रेय शिवसेनेला मिळू नये भाजपने हा विषय जाणीवपूर्वक टाळला आहे. परंतु मागे एका कार्यक्रमात शिवसेनेचे मंत्री आणि पालकमंत्री म्हणून रामदास कदम यांनी हा विषय उचलून धरण्यापेश्या उलट चंद्रकांत खैरेंना फटकारलं. ‘खैरे खासदार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला आहे की नाही ते पाहावं. गरज पडली तर वेलमध्ये बसावं. पण साप-साप म्हणून भुई धोपटायचा प्रकार थांबवावा.’ अशी शेरेबाजी रामदास कदमांनी एका कार्यक्रमात केली होती.

या आधी ही या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अनेक कार्यक्रमात टीका टिपणी केली आहे. त्यातच औरंगाबाद शहराच्या समांतर जलवाहिनीच्या मुद्यावरूनही दोघांमध्ये प्रचंड वाद होते आणि त्यामुळेच औरंगाबाद शिवसेनेमध्ये दोन वेग वेगळे गट पडले होते. परंतु निवडणूक जवळ आलेल्या असताना आणि स्थानिक शिवसेनेत या दोन नेत्यांमुळे दोन गट पडल्यामुळे त्याचे दुष्परिणाम येत्या निवडणुकीत भोगावे लागू शकतात त्याचीच दखल शिवसेना नैतृत्वाने घेतली आणि त्याचाच भाग म्हणून अखेर रामदास कदमांची औरंगाबाद पालकमंत्री पदावरून उचल बांगडी करण्यात आली आहे असं बोललेलं जात आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x