आज महाराष्ट्र सरकारकडून ‘दुष्काळसदृश’ परिस्थितीची घोषणा झाली. वास्तविक सर्वच ग्रामीण महाराष्ट्र भयानक दुष्काळाला सामोरे जाईल अशी परिस्थिती आहे. परंतु याच काँग्रेस – राष्ट्रवादीचे वाभाडे कडून सत्तेत आलेल्या भाजप आणि शिवसेनेने सामान्यांना अशी जाहिरातबाजीने आश्वासन दिली होती.
२०१४ पासून भाजपने स्वतःसाठी जलयुक्त शिवाराची जाहिरातबाजी केली, तर दुसरीकडे शिवसेनेने शिवजल योजनेच्या नावे मार्केटिंग केलं. परंतु ४ वर्ष त्याच विषयावर काम केलं होत तर अशी भयानक स्थिती का ओढवली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाण्याचा प्रश्न अजूनच भेडसावला आहे. एकप्रकारे राज्यात दुष्काळ जाहीर झाल्याने जलयुक्त शिवार आणि शिवजल योजने पितळ उघड झालं आहे.
