2 May 2025 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

अंधेरी पूल दुर्घटना: जीवन ज्योत प्रतिष्ठाणचा रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या 'त्या' कामगारांना मदतीचा हात

मुंबई : अंधेरी पूल दुर्घटना घडल्यानंतर अनेक कामगार रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी भर पावसात राबताना दिसत आहेत. परंतु त्यात आता माणुसकीच दर्शन घडविणाऱ्या घटना सुद्धा दिसू लागल्या आहेत. भर पावसात रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या कामगारांसाठी मुरजी पटेल यांच्या जीवन ज्योत प्रतिष्ठाण या समाजसेवी संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे.

भर पावसात रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या कामगारांसाठी जीवन ज्योत प्रतिष्ठाणने खाण्या-पिण्याच्या वस्तू प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन पुरविल्या आहेत. दिवसभर मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम असून त्यात भर म्हणजे अनेक व्हीआयपी प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देत असल्यामुळे, प्रत्यक्ष ठिकाणी राबणाऱ्या कामगारांकडे कोणाचे लक्ष जात नव्हते. परंतु प्रत्यक्ष घटनास्थळाच्या भेटी दरम्यान भाजपचे नगरसेवक असलेले मुरजी पटेल यांच्या ते निदर्शनास येताच, त्यांनी पुढाकार घेऊन त्या कामगारांना जीवन ज्योत प्रतिष्ठाण तर्फे मोफत खाण्यापिण्याच्या वस्तूंची त्याच ठिकाणी सोया करून दिली, तेव्हा कामगारांचा जीव भांड्यात पडला असं दिसत होत.

दुर्घटना घडली असली तरी सध्या ही वेळ रेल्वेसेवा लवकरात लवकर पूर्ववत कशी करता येईल हे महत्वाचे आहे. ज्यामुळे लाखो प्रवाशांचा खोळंबा होणार नाही आणि आजचा दिवस जरी मुंबईकरांना खूप दगदगीचा गेला असेल तरी लवकरात लवकर रेल्वेसेवा पूर्ववत कशी करता येईल यावर प्रशासनाचा भर आहे. कारण उद्या मुंबईकर पुन्हा आपल्या दैनंदिन कामासाठी पुन्हा घराबाहेर निघेल आणि त्याआधी रेल्वेसेवा पूर्ववत होणे गरजेचे आहे. अशावेळी जीवन ज्योत प्रतिष्ठाण सारख्या समाजसेवी संस्थेचा खारीचा वाटा सुद्धा महत्वाचा ठरतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या