30 April 2025 11:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

बेरोजगार युवक मोदींच्या २ कोटी रोजगाराची आतुरतेने वाट बघत आहेत : डॉ. मनमोहन सिंग

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या ‘शेड्स ऑफ ट्रूथ- ए जर्नी डिरेल्ड’ पुस्तकाचे प्रकाशन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते काल करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या अनेक आश्वासनांचे वाभाडे काढले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या अनेक फसव्या घोषणांना उजाळा दिला.

त्यावेळी बोलताना डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन कोटी रोजगार देऊ, युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु ते हवेत विरले का? बेरोजगार युवक २ कोटी रोजगाराची खूप आतुरतेने वाट पहात आहेत, असा टोला लगावला. मागील ४ वर्षात रोजगाराच्या संधी वाढण्याऐवजी त्या अधिक प्रमाणात घटल्या आहेत. आम्ही रोजगाराच्या, नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या असे नरेंद्र मोदी सरकारकडून सांगण्यात येत असले तरी सुद्धा त्यात अजिबात तथ्य नसल्याचे डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

तसेच ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोलताना डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’, स्टँड अप इंडिया यांसारख्या योजनांचा हवा तसा सकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. केवळ घाईने घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या आणि जीएसटी लागू करण्याच्या निर्णयामुळे आर्थिक आघाडीवर देशातील उद्योग क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे अशी जाहीर टिपणी सुद्धा त्यांनी केली आणि मोदी सरकारच्या विविध योजनांचे वाभाडे काढले.

विद्यमान कृषी व्यवस्थेवर बोलताना मनमोहन सिंग म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात देशातल्या शेतकऱ्यावर दुर्दैवाने अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे. कारण या मोदी सरकारचे कृषी विषयक धोरण शेतकऱ्यांना पुरक असे ठरू शकलेले नाही. लोकसभा निवडणुकांच्या आधी मोदींनी जी आश्वासने दिली होती त्यातील कोणतेही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेली नाहीत, अशीही जळजळीत टीका त्यांनी उपस्थितांसमोर बोलताना केली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या