नवी दिल्ली : काँग्रेस तसेच डाव्या पक्षांनी देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या तसेच एकूणच वाढलेल्या महागाईविरोधात आज भारत बंद पुकारला आहे. आज सकाळ पासूनच प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक तसेच बसेस अडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. जवळपास देशभरातील एकूण ३१ पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला असला तरी महाराष्ट्रात मनसेने सक्रिय पाठिंबा दिल्याने राज्यात मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली होती.

आजच्या बंदमध्ये सहभागी असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. परंतु महाराष्ट्राचा विचार करता या भारत बंद मधील राज ठाकरेंच्या कार्यकत्यांचीच आणि त्यांच्या आंदोलनाची दखल माध्यमांनी सार्वधिक घेतली असं चित्र पाहायला मिळत आहे. एकूणच मनसे शिवाय काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हे आंदोलन आक्रमक पणे यशस्वी करू शकले असते का, याबातच शंका उपस्थित होऊ लागली आहे.

परंतु मनसे सक्रिय पणे रस्त्यावर उतरल्याने भारत बंदचा परिणाम महाराष्ट्रात दिसून आला आहे. महाराष्ट्रात काही किरकोळ गोष्टी वगळता एखादी अति हिंसक घटना घडली नसून, महाराष्ट्र सैनिकांनीच राज्यातील महागाईविरोधातील भारत बंद हायजॅक केल्याचे चित्र आहे. परंतु मनसेच्या सक्रिय सहभागामुळे शिवसेनेकडून दिवसभर द्विधा मनस्थिती असल्यासारख्या प्रतिक्रिया दिवसभर येत आहेत.

संपूर्ण भारत बंदचा राज्यातील आढावा घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार असल्याचे वृत्त आहे.

Inflation and Bharat Band – MNS Chief Raj Thackeray will address Press Conference Today 6.30 PM