16 February 2025 1:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Paytm Share Price | पेटीएम शेअरबाबत मोठे संकेत, मजबूत कमाई होणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: PAYTM Zomato Share Price | झोमॅटो शेअर ₹400 टार्गेट प्राईस गाठणार, तज्ज्ञांनी दिले संकेत, अपडेट नोट करा - NSE: ZOMATO ITC Share Price | 2320 टक्के परतावा देणारा आयटीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: ITC Numerology Horoscope | रविवार, 16 फेब्रुवारी 2025, अंकज्योतिषशास्त्रानुसार तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या EPFO Passbook | पगारदारांनो, आता तुम्हाला EPF खात्यातून एकाच वेळी इतकीच रक्कम काढण्याची मुभा, इथे पहा अपडेट Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत फायद्याची बातमी, धावणार शेअर, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL Loan EMI Alert | कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडायचं आहे, EMI भरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
x

मराठा समाजाचा ९ ऑगस्टला महाराष्ट्र बंद, तर केस व नोटीस पाठवायचीच असेल तर पहिली केस माझ्यावर टाका: नितेश राणे

औरंगाबाद : समस्त मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी म्हणजे क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. त्यासंबंधित मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी लातूर येथे पार पडली असता हा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच कार्यकर्त्यांना राज्यभर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी म्हणजे ९ ऑगस्ट २०१६ रोजी औरंगाबादमधून मराठा क्रांती मूक मोर्चास राज्यभर सुरवात झाली होती. त्यामुळे या तारखेचे औचित्य साधून त्याच दिवशी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात अली आहे.

औरंगाबाद मधील क्रांती चौकात रविवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सुद्धा ठिय्या आंदोलन सुरूच होते. त्या ठिकाणी मोर्चेकऱ्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. याआधी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सारख्या महत्वाच्या शहरांमध्ये सुद्धा विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच सोलापूर, मंगळवेढा, बार्शी, माढा, इंदापूर भागांत आंदोलनाला हिंसक वळण लागून एसटीवर दगडफेकीच्या घटना घडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक बंद करण्याची वेळ आली होती. त्यानंतर बीड – परळी तहसील कार्यालय परिसरात युवकांनी अर्धनग्न आंदोलन पुकारले होते.

मराठा समाजाचे आंदोलन सध्या आक्रमक होत चालले असून सरकारची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांना या आक्रमक आंदोलना विषयी विचारले असता ते म्हणाले की,’राज्यभरात मराठा आंदोलनाची दिशा बदलली असून, याला राज्य सरकारच जबाबदार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या सरकारने न्यायालयात शपथपत्र दिले असते, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. यापुढे दिवसेंदिवस चिघळणाऱ्या आंदोलनाला सरकारच जबाबदार राहील.

दुसरीकडे आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या पोलीस कारवाई संदर्भात आमदार नितेश राणे म्हणाले की,’पोलिसांनी उगाच मराठा समाजाचा तरूणांना नोटीस आणि केसेस टाकून त्रास देऊ नये..आम्ही अपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहोत..केस आणि नोटीस पाठवायचीच असेल तर पहिली केस माझ्यावर टाका..मी तयार आहे!!’.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x