पुणे : आज मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी पुण्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील शेकडो समन्वयकाच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण परिषद पार पडली.

त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता सरकारला गंभीर इशारा दिला आहे. केवळ सोयीच्या राजकामुळे या आंदोलनात आजपर्यंत अनेक बळी गेले आहेत. त्यांच्यावर मुलभूत अधिकारांसाठी भिकाऱ्यासारखे फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत सरकारने त्वरीत तोडगा काढावा, नाहीतर मराठा समाजाचा उद्रेक होईल असा गंभीर इशारा त्यांनी उदयनराजे यांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान त्यांनी आरक्षणाबाबत निर्णय होईल, लोकांनी तोडफोड-जाळपोळ करू नका, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलनकर्त्यांना केले आहे. त्यामुळे पुढे सरकार’कडून पुढे काय हालचाली होतात ते पाहावं लागणार आहे.

Maharashtra government have to take precautionary action before maratha community will get violent