मुंबई : महाराष्ट्रातील बहुचर्चित असलेला विषय म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा. मराठा समाजाच्या आर्थिक तसेच सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाचा प्रगती अहवाल सादर केला. मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
अॅड. विनोेद पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार मराठा समाजाला आरक्षण देताना त्यासाठी एक कालबद्धता निश्चित करावी अशी विनंती करण्यात आली होती. दरम्यान, ए.ए. सय्यद तसेच न्या. एस.सी. गुप्ते यांच्या खंडपीठासमोर होणारी या विषयावरील सुनावणी आता न्यायालय क्रमांक ३ कडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार न्या. आर.एम. सावंत आणि न्या. के.के. सोनावणे यांच्या खंडपीठासमोर सकाळी अकरा वाजता ही सुनावणी पार पडली.
राज्यातील संपूर्ण मराठा समाजाचं न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागून राहील आहे. या संदर्भात राज्य सरकारची भूमिका सुद्धा महत्वाची ठरणार आहे.
