19 April 2024 3:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

मनसेचा शिवसेनेला सवाल, ठाणे कोपरी पूल कोसळण्याची वाट बघत आहात का? अविनाश जाधव

MNS, shivsena, uddhav thackeray, raj thackeray, avinash jadhav, eknath shinde, thane, kopri bridge

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील दुर्घटनेनंतर मुंबई आणि ठाण्यातील पुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाण्याच्या कोपरी वाहतूक पुलाची अवस्था म्हणजे तो पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. हा पूल पूर्व द्रुतगती मार्गावर असून ठाणे येथील कोपरी विभागाच्या रेल्वे पटरीवरून वाहनांची ये जा करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. असे असताना ठाण्याचे पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे कशाची वाट बघत आहेत? असा सवाल मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. तसेच हा पूल तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

२०१४ च्या निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पाडून सर्व सामान्य लोकांना मूर्ख बनवत सत्तेत आलेले युतीचे सरकार सगळ्याच स्तरावर फेल ठरत चालले आहे. दुर्घटना असतील कि शेतकऱ्यांचे प्रश्न, शिवसेना – भाजप सरकार हे सपशेल फेल ठरलं आहे अशी काहीशी सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया आहे. आम्ही सत्तेत आलो कि महाराष्ट्र टोल मुक्त करू, झाला का महाराष्ट्र टोल मुक्त? याच पूर्व द्रुतगती मार्गावर रोज सकाळी आणि संध्याकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. टोलचे सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रास टोल वसुली केली जाते आणि आजू बाजूच्या नागरिकांना यामुळे प्रचंड ट्राफिक आणि प्रदूषणाचा सामना करावा लागतो.

गुरुवारी झालेल्या पूल दुर्घटनेत ६ लोकांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. ह्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी आणि योग्य ती उपाय योजना करावी. तर आणि तरच मुंबईकरांना न्याय मिळेल अन्यथा अशा घटना घडत राहतील आणि सामान्य मुंबईकरांचे प्राण जाताच राहतील.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x