मुंबई : केरळच्या संपूर्ण इतिहासात झाला नसेल इतका पाऊस केरळमध्ये काही दिवसांपासून पडत होता आणि त्यामुळे संपूर्ण राज्यच ठप्प झाल्यासारखी स्थिती होती. या महापूरामुळे २.२३ लाख जनता आणि ५०,०० कुटुंबे बेघर झाली आहेत. तसेच या सर्व बाधित लोकांना १,५६८ मदत केंद्रांमध्ये हलवण्यात आल्याची माहिती सुद्धा विजयन यांनी दिली आहे.

केरळातील महापुरात लाखो संसार उध्वस्त झाले असून आता उसंत घेतलेल्या पावसामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. देशभरातून, अनेक राज्यातून तसेच परदेशातून सुद्धा मदतीचा ओघ सुरु असताना अनेक संस्था तसेच वैयक्तिक पातळीवर सुद्धा केरळला मदत पाठविण्यात येत आहे.

त्या मदतीचाच भाग म्हणून मनसेच्या अनेक शाखांनी लोक सहभागातून निधी तसेच अत्यावश्यक गोष्टी जमा करून त्या केरळच्या दिशेने रवाना केल्या आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन केलेल्या या मदतीची स्थानिक जनतेने सुद्धा स्तुती केली आहे आणि त्यांना भरभरून प्रतिसाद सुद्धा दिला आहे. त्यानंतर लोक सहभागातून जमा करण्यात आलेली सर्व मदत केरळच्या पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आली आहे.

MNS workers helping hands for Kerala flood affected peoples