उत्तर प्रदेश : आमचे नेते दलितांच्या घरी जातात तेंव्हा त्यांना रात्रभर मच्छर चावतात तरी आम्हाला होणारा त्रास सहन करून आम्ही त्यांना भेटतो असं वादग्रस्त विधान उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनुपमा जयसवाल यांनी केल्याचे वृत्त आहे.

काही दिवसांपासून दलित समाजात स्वतःच्या पक्षाबद्दल पुन्हां विश्वास निर्माण करण्यासाठी उत्तर प्रदेशचे भाजप नेते आणि मंत्री अनेक शक्कल लढवत आहेत. त्यात मग भाजपाचे नेते दलितांच्या घरी जाऊन जेवण करत आहेत आणि त्यातही जाताना स्वतःसोबत हॉटेलचे जेवण आणि भान्डी घेऊन जाणे असे अनेक प्रकार सुरु आहेत.

त्यातच आता दलितांच्या घरी जाऊन भेटी-गाठी घेणे आणि त्यांच्या घरी वास्तव्य करणे असे अनेक प्रकार सुरु आहेत. त्यालाच अनुसरून उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनुपमा जयसवाल यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. त्या असं म्हणाल्या की, आमचे नेते स्थानिक दलितांच्या घरी गेले की रात्रभर त्यांना डास चावतात, त्यामुळे आमच्या नेत्यांना आणि आम्हाला त्याचा त्रास होतो. परंतु असे असले तरीही भाजपाचे नेते आणि इतर मंत्री दलितांच्या घरी जेवणासाठी जातात असे अनुपमा जयसवाल यांनी ए.एन.आय कडे स्पष्ट केले. दलितांना चांगल्या सुविधांपासून वंचित ठेवता काम नये.

mosquitoes bite us all night in dalits homes says utter pradesh minister