कोचिन : पंतप्रधान मोदींनी केवळ स्वतःच्या जवळच्या १५ मित्रांना कमाल उत्पन्न वाढण्याची गॅरंटी दिली असून शेतकऱ्यांना मात्र पूर्णपणे फसविले आहे. तुम्ही केवळ अनिल अंबानी असाल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल. तर या उलट आमचा काँग्रेस पक्षाने किमान उत्पन्न योजना आणली असून ही योजना सर्व सामान्य देशवासियांसाठी लागू होईल, अशी टीका करत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना लक्ष केले.

त्याउलट काँग्रेसने सत्तेत येताच क्षणी ३ राज्यांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. २०१९ मध्ये लोकसभेमध्ये आमची सत्ता येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षांत शेतकऱ्यांविरोधात जे गुन्हे दाखल केले आहेत, ते नक्की दुरुस्त करू. केरळातील तरुण आणि महिलांनी राजकीय क्षेत्रात वरिष्ठ पदावर जावे, केरळच्या महिला यासाठी सक्षम असल्याचे राहुल गांधी केरळमधील जाहीर सभेदरम्यान म्हणाले.

narendra modi fooled all farmers and only increased friends income says rahul gandhi