मुंबई : सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आणि छत्तीसगडमध्ये स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी भाषिक राज्यांमध्ये धार्मिक राजकारण मोठ्या प्रमाणावर केलं गेलं असलं तरी ते मतदाराने स्पष्टपणे नाकारलं आहे हे निवडणुकीच्या निकालांवरून दिसत आहे.

दरम्यान, आरबीआय – सीबीआय – न्यायाधीश ते सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून सर्वच मोदी राजवटीत हैराण झाल्याचे पहायला मिळत होते. २०११ मध्ये गुजरात भेटीवर गेलेलं मोदी या देशाचे पंतप्रधान व्हावे असं वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरे यांचे ते विधान २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत सत्यात उतरले होते आणि मोदी बहुमताने या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.

परंतु, एकूणच सर्व बाजूने आलेला नकारात्मक अनुभव आणि शेतकऱ्यांपासून ते सामान्य लोकांची झालेली फसवणूक आणि चुकीची धोरणं, यामुळे अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती.दरम्यान, कालच त्यांनी आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर प्रसार माध्यमांकडे प्रतिक्रिया नोंदवताना नरेंद्र मोदी यांच्या सरकारची उलटी गिनती झाल्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान आजच्या ५ राज्यांमधील निकालाअंती भाजपच्या वाट्याला एकही राज्य येताना दिसत नसल्याने, राज ठाकरेंची ही भविष्यवाणी सुद्धा दुसऱ्याच दिवशी सत्यात उतरताना दिसत आहे. भाजपच्या कार्यालयांमध्ये सन्नाटा पसरल्याचे दिसत आहे.

narendra modis bad patch will start soon says mns chief Raj thackeray after urjit patels resign