1 May 2025 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

बाळासाहेबांचं स्मारक ५ वर्षे का रेंगाळले या प्रश्नामुळे उद्धव यांना मिरची झोंबली: अजित पवार

मुंबई : सामनातून झालेल्या टीकेतून शिवसेनेकडून तीच भाषा अपेक्षित होती. परंतु उद्धव ठाकरेंना इतक्या मिरच्या का झोंबल्या ? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील खूप महत्वाचे नेते आहेत. पण त्यांचे स्मारक तब्बल पाच वर्षे का रेंगाळले? हा माझा प्रश्न काही चुकीचा नव्हता. केवळ स्पष्ट बोलल्यामुळे उद्धव ठाकरेंना कोल्हापुरी मिरची झोंबली, असा सणसणीत टोला अजित पवार यांनी सामनातील अग्रलेखावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, शिवराळ भाषेत शिवसेनेकडून करण्यात आलेले प्रतिक्रिया म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचा टोला अजित पवारांनी लगावला.

दरम्यान, स्वतःच्या पहिल्या प्रतिक्रियेवर बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्याच्या ग्रामीण भागात बाप असा शब्दप्रयोग केला जातो, तर शहरी भागात वडील असा उल्लेख केला जातो. त्यामुळे माझा शब्दप्रयोग योग्यच आहे. मी केवळ चांगल्या भावनेनेच माझी भूमिका मांडली होती. पण सत्य बोचल्याने उद्धव ठाकरेंना मिरच्या झोंबल्या आहेत. परंतु, शिवसेनेने माझ्यावर कितीही खालच्या पातळीवर टीका केली असली तरी मी त्याकडे लक्ष देत नाही. कारण कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत,असे अजित पवार म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या